|
|  |
 | जपा त्वचेच्या जंतुसंसर्गापासून (डॉ. अमित महाजन)
त्वचेवर अब्जावधी सूक्ष्मजीव सुखेनैव राहात असतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी
झाली की त्यांचा उपद्रव वाढू लागतो. त्वचेचा असा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी तिची
नित्य निगा राखणे हाच उत्तम प्रतिबंधक उपाय आहे. ........ |
मगरमिठी (डॉ. श्री बालाजी तांबे)
त्वचेचा संबंध असतो वायुतत्त्वाशी. सर्व प्रकारचे स्पर्श त्वचेमुळेच कळतात.
किंबहुना वायूचे अस्तित्वही त्वचेमुळेच कळते. त्वचेतील जीव निघून गेला तर स्पर्शच
कळणार नाही. त्वचा संपूर्ण शरीराला व्यापून असल्याने कदाचित मिठी मारल्यावर
एकमेकांना आश्वस्तता मिळते. त्वचेच्या स्पर्शज्ञानामुळे मिठीचे सुख मिळते परंतु
त्वचारोगाचा स्पर्श झाल्यास ती मगरमिठीच ठरू शकते. ....... |
त्वचारोग आणि रक्तशुद्धी (डॉ. श्री बालाजी तांबे)
आयुर्वेदशास्त्रानुसार त्वचेचे रोग मुख्यत्वे रक्त दूषित झाल्यामुळे होत असतात.
शरीराच्या आत असणाऱ्या रक्ताचा परिणाम बाह्यत्वचेवर जसा होतो तसाच त्वचेवर झालेला
जंतुसंसर्ग उपेक्षित राहिला तर त्यामुळे रक्तही बिघडू शकते. त्वचेच्या माध्यमातून
जंतू शरीरात प्रविष्ट झाले तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणून त्वचा
स्वच्छ व निरोगी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे असते. ....... |
आहारकल्पना (डॉ. श्री बालाजी तांबे)
अन्नद्रव्यांपासून तयार केलेले काही पदार्थ अनुपान म्हणून, औषधाला पूरक म्हणून
अथवा उपचारांचा एक भाग म्हणूनही वापरले जातात. यालाच औषधशास्त्रामध्ये
"आहारकल्पना' असे म्हटले आहे. ....... |
फळं फर्स्टक्लास; फळपेयं थर्डक्लास! (डॉ. अनिल मोकाशी)
फळ सोलणे, चोखणे, चघळणे, चव, रंग, आकार, पोत ओळखणे या कला शिकण्याची संधी लहान
मुलांना फळ खाण्याने मिळते, रसांनी मिळत नाही. खरं तर ते फक्त गोड पाणी आहे.
फळपेयांना हेल्थ ड्रिंक्स मानणं चुकीचं आहे. ........ |
असाध्य ते साध्य... (लक्ष्मण लोंढे)
"मोटार न्यू रॉन डिसीज' या अवघं जीवन परावलंबी करून टाकणाऱ्या रोगानं शरीरावर
हल्ला केला. "दीड वर्ष !' डॉक्टरांनी निरवानिरवीसाठी मुदत देऊन टाकली. त्याला आता
तीस वर्षं होत आली. जयंतीभाईंनी जणू साक्षात यमदूतांनाच, "मला अजून जगायचंय,
तुम्ही परत जा' अशी आज्ञा दिली आणि ते चुपचाप माघारी वळले ! ....... |
प्रश्नोत्तरे माझे वय ६९ वर्षे असून दही, केळे, थंड पदार्थ वगैरे वर्ज्य करूनही शरीरात वारंवार
कफनिर्मिती होते. अपचन, मांसाहार हे याचे कारण असू शकते का? मात्र शाकाहारामुळेही
असा त्रास होतोच. तपासणीमध्ये कुठलाही दोष सापडत नाही. तरी कुठले औषध घ्यावे, याचे
मार्गदर्शन करावे. ......
- दिनकर शिर्के, डोंबिवली |
|
|  |
|