|
|  |
 | आझमी फॅमिली मुंबई - कैफी आझमी यांच्या उर्दू कवितांच्या सिडींचे मुंबईत प्रकाशन करण्यात आले,
त्या वेळी व्यासपीठावर गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी, तन्वी आझमी आणि
शौकत आझमी उपस्थित होते. |
केवळ ५५ टक्केच पावसाळी कामे पूर्ण मुंबई, ता. ११ - पावसाळा तोंडावर आल्याने लोकप्रतिनिधींपासून प्रशासनापर्यंत
सर्वांचीच धावाधाव सुरू झाली आहे; मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ ५५
टक्केच पावसाळी कामे झाल्याबद्दल महापौरांपासून पालिका आयुक्तांपर्यंत सर्वांनीच
नाराजी व्यक्त केली आहे. |
मॉं ... एक फिल्मी प्रवास स्त्रीमुक्ती किंवा "एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन' या संकल्पनेला मूर्त रूप मिळालं ते
मातृपटांनी. काळानुसार हिंदी सिनेमा जसा बदलला, तशी त्यातली आईसुद्धा बदलली.आता
उत्सुकता आहे ती वेगवेगळ्या वळणांवरून प्रवास करणाऱ्या या आईच्या भविष्यातल्या
रूपाची.
व्हिडिओ
पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
शिवसेनेकडून जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न ठाणे, ता. ११ - शिवसेना हा पूर्वीपासून मनुवादी पक्ष म्हणूनच ओळखला जात आहे.
त्यामुळेच लोकसभेच्या पोटनिवडणुकीत जातीचे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे;
पण आम्ही मात्र प्रचाराची पातळी सोडणार नसून विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक
जिंकणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी
व्यक्त केला. |
"बॉलीवूड मॉम्स' बॉलीवूडमधली आपली कारकिर्द यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर काही अभिनेत्री, याच
क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या आपल्या मुलांच्या पाठीही खंबीरपणे उभ्या राहिल्यात.
अशाच काही
"बॉलीवूड मॉम्स'चा हा परिचय..... |
निर्व्यसनी, आदर्श नागरिक घडविण्याचे आव्हान - अण्णासाहेब मोरे मुंबई, ता. ११ - मानवी जीवन विविध समस्यांनी जर्जर झाले आहे. नोकरी, शिक्षण,
आरोग्य, विवाह संस्था तसेच ताणतणावासारख्या समस्यांमुळे मानवजातीपुढे निर्व्यसनी व
आदर्श नागरिक घडविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय
श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे अध्यक्ष गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी हजारो
सेवेकऱ्यांशी संवाद साधताना केले. |
वृत्तपत्र विक्रेते गेले मलेशियाला! मुंबई, ता. ११ - "सकाळ' वृत्रपत्रसमूहामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या गावांमधील
काही वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांच्या भाग्यात आज मलेशियावारीचा योग आला. |
भारताची एकात्मता अबाधित राहावी! मुंबई, ता. ११ - आज एका राज्यातील जनता दुसऱ्या राज्यातील जनतेकडे वैराच्या
भावनेतून पाहात आहे. यामुळे भारताच्या एकात्मतेला बाधा पोहोचत आहे. |
जातींवर होत असलेला अन्याय हा दहशतवादच - डॉ. नरेंद्र जाधव मुंबई, ता. ११ - जर्मनीमध्ये ६० वर्षांपूर्वी झालेला नरसंहार आणि अफगाणिस्तानामधील
सद्यस्थितीबाबत विचार करताना आपल्या समाजातील विविध घटकांवर वर्षानुवर्षे
चाललेल्या आणि कधीतरी उफाळून येणाऱ्या अत्याचारांकडे पाहण्याची गरज आहे, असे मत
"ग्रंथाली'ने आयोजित केलेल्या चर्चासत्रामधून पुढे आले. |
सीकेपी राज ठाकरेंना मुंबईत कसे ठेवायचे? - कपिल पाटील मुंबई, ता. ११ - उत्तर प्रदेश, बिहारी लोकांना महाराष्ट्रातून हुसकावण्याची मोहीम
सुरू करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही कायस्थ असल्याने
त्यांना तरी इथे कसे ठेवायचे, असा सवाल आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. |
बस अपघातात तीन ठार; १३ जखमी माणगाव - येथील इंदापूर गावाजवळील मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (ता.११) पहाटे
३.४५ च्या सुमारास मिनी बस आणि लक्झरी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण
अपघातात तीन जण ठार; तर १३ जण जखमी झाले आहेत. |
लागते ती आस... जडतो तो जीव! मुंबई - एकविसाव्या शतकात वेगाने पुढे सरकणाऱ्या जगात नात्यातील गोडवा कमी कमी होत
चालला आहे. शहरांत राहण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. "लाईफस्टाईल'मध्येही
कमालीचा बदल झाला आहे. |
"गर्जतो मराठी'नंतर आता "गर्जतो गुजराती' मुंबई, ता. ११ - "गर्जतो मराठी' अशी मराठी माणसाला साद घालीत शिवसेनेने आयोजित
केलेले प्रदर्शन यशस्वी झाल्यांतर आता शिवसेनेने गुजराती भाषकांना आकर्षित
करण्यासाठी मुंबईत "शिवसेना व्यापार संघटना' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. |
मुलाचा खून करणारी महिला अटकेत मुंबई, ता. ११ - दारूच्या नशेत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून आपल्या
चार वर्षांच्या मुलाचा खून करणाऱ्या वरळीतील एका महिलेला पोलिसांनी आज अटक केली. |
विरार येथे रिक्षा अपघातात दोन ठार; दोन जखमी विरार, ता. ११ - आगाशी-विरार रस्त्यावर आज सकाळी क्वालीस गाडीला ओव्हरटेक करणाऱ्या
ऑटोरिक्षाला समोरून ट्रकची ठोकर लागल्याने दोन प्रवासी महिला ठार झाल्या; तर
रिक्षाचालक व एक प्रवासी असे दोघे गंभीर जखमी झाले. |
|
|  |
|