विमानसेवा सुरु झाली अन् अनेकांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला...

airport
airport

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत शहराच्या बाहेर पडणाऱ्यांची धडपड करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यापासून दोन दिवसाची आकडेवारी बघता 6 हजार 867 प्रवाशांनी मुंबई सोडणे पसंत केले आहे; तर केवळ 2 हजार प्रवासी शहरात दाखल झाले आहे.

दोन दिवसात छत्रपती शिवाजी महाराज आतंराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने सुमारे 88 विमाने उडाली केली. या दिवसात एकूण 9,076 प्रवाशांना विमानतळ व्यवस्थापनाने हाताळले. यामध्ये मुंबई शहराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या 6,867 एवढी होती. तर मुंबईत केवळ 2,210 प्रवासी दाखल झालेत. मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अनेकांनी शहर सोडण्याचा कल असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

यामध्ये पहिल्या दिवशी 3752 प्रवासी मुंबईबाहेर पडले तर 1100 प्रवासी शहरात दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी सुमारे 1110 प्रवासी मुंबईत आले, तर 3114 प्रवाशांनी मुंबईबाहेर उड्डाण केले. दिल्ली हवाई मार्ग सर्वात व्यस्त मार्ग होता. 

आकडेवारी दृष्टीक्षेपात ः
दोन दिवसातील विमानतळावरील प्रवासी : 9,076 
मुंबईबाहेर गेलेले प्रवासी :  6,867  
मुंबईत दाखल झालेले प्रवासी : 2,210  
दोन दिवसात विमानांचे आवागमन : 88 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com