Ahmednagar : शेतकऱ्यांसाठी पत्रव्यवहार करणार ; अण्णा हजारे

अण्णा हजारे ; विनाखंडित वीजपुरवठ्याची मागणी
 Anna
Annasakal
Updated on

पारनेर : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना राज्य अन्न आयोगाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेल्या आदेशाची प्रत व अन्य निवेदने दिली. यावेळी अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विजजोड खंडीत करण्यात येऊ नयेत, ट्रान्सफॉर्मर बंद करू नयेत, शेतकऱ्यांना विना खंडित कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा करावा असे आदेश दिले आहेत, त्या आदेशाची प्रत हजारे यांना दिली. हजारे यांनी याचा लाभ लाखो शेतकऱ्यांना होईल असे मत व्यक्त केले.

राळेगणसिद्धी येथे (ता. एक) शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार (पुणे), सचिन धांडे (जळगाव) व बळीराम सोळंके (बीड) यांनी संयुक्तरित्या दाखल केलेल्या याचिकेवर झालेला निर्णयाची माहिती हजारे यांना दिली. त्यावर अण्णांनी समाधान व्यक्त केले.

शेतकऱ्यांची कृषी पंपाचे वीज जोड खंडीत करू नयेत याबाबत आयोगाने दिलेल्या आदेशावर राज्य सरकारने तत्काळ परिपत्रके काढून विद्युत वितरण कंपनीला द्यावेत त्यासाठी हजारे यांनी सरकारकडे पत्रव्यवहार करावा अशी मागणी संघटणेच्या वतीने हजारे यांच्याकडे केली. दूध दर तसेच पीकविम्यासाठीही संघटणेने लढा दिल्याने पवार यांनी हजारेंना सांगितले.

नगर जिल्हाध्यक्ष सुभाष वाळुंज, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, हिरामण बांदल, अशोक गायकवाड,भ्रष्टाचार विरोधी न्यासायचे दत्ता आवारी, अन्सार शेख व राम सातकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.