Amit Thackeray Ahmednagar Visit : जनतेने परिवर्तनासाठी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी; अमित ठाकरे

अमित ठाकरे; मराठी माणसाच्या अस्मितेला ‘मनसे’चे महत्त्व
amit thackeray ahmednagar visit change in society developments maharashtra politics mns
amit thackeray ahmednagar visit change in society developments maharashtra politics mns sakal
Updated on

अहमदनगर : सध्याच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जनता वैतागली आहे. जनतेला नवीन पर्यायाची गरज आहे. मराठी माणसाच्या अस्मितेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने महत्त्व दिले आहे. जनतेने परिवर्तनासाठी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.

ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्‌घाटन केले. संस्थेचे पदाधिकारी सुमतिलाल कोठारी,

अजित बोरा, मकरंद खेर, प्राचार्या डॉ. माहेश्‍वरी गावित यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृहामध्ये विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, सुमीत वर्मा, गजेंद्र राशीनकर, चंद्रकांत ढवळे, प्रकाश गायकवाड, अनिकेत शियाळ, प्रमोद ठाकूर, स्वप्नील वाघ आदी उपस्थित होते.

amit thackeray ahmednagar visit change in society developments maharashtra politics mns
Amit Thackeray : सरकारच्या दुर्लक्षामुळे इर्शाळवाडीची घटनाच; अमित ठाकरेंचा आरोप

ठाकरे म्हणाले, की सध्याच्या राजकारणाचा दर्जा खालावला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही जण गैरव्यवहारांची चौकशी थांबविण्यासाठी पक्ष बदलत आहेत. सर्वसामान्य जनता या राजकीय चिखलफेकीला वैतागली आहे. जनता आता नवीन पर्यायाच्या शोधात आहे. मनसेने सतत मराठी माणसाच्या अस्मितेला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून नवीन नेते तयार होतील.

amit thackeray ahmednagar visit change in society developments maharashtra politics mns
Ahmednagar News : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजारांचा दंड ठोठावला

अभिनव उपक्रमाचे कुतूहल

अमित ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृहावर मोठी गर्दी केली होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. राजकीय नेते जनतेशी कशा पद्धतीने संवाद साधतात,

हे जाणून घेण्यासाठी कुतूहलापोटी आलेल्यांची संख्या मोठी होती. विश्रामगृहातील हॉलमध्ये एका वेळी सुमारे शंभर विद्यार्थ्यांना सोडले जात होते. ठाकरे खुर्चीवर न बसता त्यांच्याशी बोलणाऱ्या प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणणे ऐकून घेत होते. राजकीय नेता म्हटल्यावर एकतर्फी संवाद, ही संकल्पना त्यांनी मोडून काढली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.