Water Crisis : पाणीटंचाईचे संकट पाठ सोडेना;तालुका टंचाईमुक्त कधी होणार?

तालुक्यासह पठारभागात वर्षानुवर्षे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. उन्हाळा लागला की, गावोगावी व वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू असल्याचे पहावयास मिळते.
Water Crisis
Water Crisis sakal
Updated on

संगमनेर : तालुक्यासह पठारभागात वर्षानुवर्षे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. उन्हाळा लागला की, गावोगावी व वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू असल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे संगमनेर तालुका हा पाणीटंचाईतून कधी मुक्त होणार आहे? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

संगमनेर तालुक्यातील अनेक गावांसह पठारभाग वर्षानुवर्षे पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात धो-धो पाऊस पडतो. मात्र, पावसाचे संपूर्ण पाणी वाहून जाते आणि उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. हंडाभर पाण्यासाठी महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते. पुरुष मंडळीही मोटारसायकलला ड्रम बांधून पाणी वाहतात, अशी भयाण परिस्थिती वर्षानुवर्षे पठारभागासह तालुक्यातील काही गावांमध्ये पहावयास मिळते. परंतु, असे असताना तालुका हा टंचाईमुक्त कधी होणार आहे, असा प्रश्‍न नागरिकांनी विचारला आहे.

याचबरोबर उन्हाळ्यात पाण्याअभावी संपूर्ण शेती पडीक असते. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी येथील महिला पुणे जिल्ह्यात रोजंदारीसाठी जातात. संपूर्ण विदारक चित्र डोळ्यासमोर असताना अद्यापही आमदार, खासदारांना पठारभागाचा पाणीप्रश्‍न सोडवता आला नाही. आजही अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे. याचबरोबर तालुक्यातीलही अनेक गावांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही, त्यांना उन्हाळ्यात टँकरशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे संगमनेर तालुका पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.

‘जलजीवन’च्या अनेक तक्रारी

संगमनेर तालुक्यातील अनेक गावांसह पठारभागातील गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेची कामे सुरू आहे. काही ठिकाणी कामे बोगस झाल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, आजच्या मदतीला जलजीवन मिशन योजनेची कामे अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. ही कामे चांगल्या दर्जाची झाली, तर शंभर टक्के गावोगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. त्यासाठी या कामांमध्ये पारदर्शकता असणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच कुठेतरी संगमनेर तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.