Akola Crops Damaged : अतिवृष्टीचा ५७ हजार हेक्टरवरील पिकांना फटका,ऑगस्ट व सप्टेंबरमधील स्थिती : मदतीसाठी हवे ७९ कोटी

Akola Crops Damaged : अकोला जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी रुपयांच्या मदत निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
Akola Crops Damaged
Akola Crops Damaged sakal
Updated on

अकोला : जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. त्यानुसार दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ५७ हजार ७५८.५ हेक्टरवरील पिके बाधित झाली.

५७ हजार ३१९ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने संबंधितांच्या मदतीसाठी ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ रुपयांची आवश्यकता आहे. सदर मदत निधीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केला आहे.

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे गत खरीप हंगामात एक लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले हाेते. त्यानंतर नाेव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील एक लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवर पिकं बाधित झाली. फेब्रुवारी महिन्यातही अवकाळीमुळे ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. ९ एप्रिल नंतर १० व ११ एप्रिल राेजीही गारपीट व अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला.

दरम्यान यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. खरीप हंगामातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागामार्फत संयुक्त पंचनामे करून सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे ५७ हजार ७५८.५ हेक्टर क्षेत्राची हानि झाली, तर ५७ हजार ३१९ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला.

संंबंधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ कोटीच्या मदत निधीची मागणी शासनाकडे केली आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे शासनाकडून मिळणाऱ्या या मदतनिधीकडे लक्ष लागले आहे.

अशी आहे स्थिती

  • या पिकांचे झाले नुकसान ः कपाशी, सोयाबीन, तूर, केळी, पानपिंपरी, लिंबू, आंबा, मोसंबी, संत्रा, डाळिंब व इतर पिके.

  • नुकसानग्रस्त गावे ः ३४९

  • नुकसानग्रस्त शेतकरी ः ५७३१९

  • नुकसानग्रस्त क्षेत्र ः ५७७५८.५

  • निधी मंजूर ः ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८

कपाशीचे सर्वाधिक नुकसान

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २६ जार ३९७.४९ हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाले, तर २४ हजार १३७.७३ हेक्टरवरील सोयाबीनला सुद्धा पावसाचा फटका बसला. पाच हजार ७५५.१ हेक्टरवरील तूरीचे पिक सुद्धा बाधित झाले. ६९४.७ हेक्टरवरील इतर पिके सुद्धा अतिवृष्टीमुळे बाधित झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.