crime sakal
अहमदनगर

Ahmednagar Crime News : आरोपींवर कठोर कारवाई करा; आरपीआयची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: पारनेर तालुक्यातील एका गावातील दलित समाजातील महिलेला खासदार नीलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीची व अत्याचाराची घटना अतिशय गंभीर आहे. या गुन्ह्यातील आरोपीना जामीन होणार नाही, अशा पध्दतीची कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली.

आरपीआयच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, पारनेरचे तालुका अध्यक्ष राजू उबाळे, श्रीगोंद्याचे राजा जगताप, पाथर्डीचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू, राहाता तालुकाध्यक्ष करण कोळगे आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील एका गावात खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ६ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे यांचा प्रचार केल्याच्या रागातून विखे समर्थकास मारहाण केली.

पत्नी तसेच आईला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. महिलेशी गैरवर्तन केले. सदर महिलेला पोलिस ठाण्यात जाता येऊ नये, असे दहशतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेमुळे पीडित कुटुंबीय अजूनही भीतीच्या सावटाखाली आहे. राजकीय वैमनस्यातून अशा प्रकारचे घडलेले कृत्य अतिशय निंदनीय असून, त्याची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेऊन यामधील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी.

मंत्री रामदास आठवले भेट घेणार

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. लवकरच पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंत्री आठवले पारनेरला येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT