farmer agitation for seeds sakal
अकोला

Akola News : अकोल्यात बियाण्यांसाठी ‘आणीबाणी’; शेतकरी रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

अकोला - शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीने बियाणे पुरवण्यात कृषी विभागाची यंत्रणा अपयशी झाल्याचे दिसते. त्यामुळे मंगळवारी सकाळी शहरातील टिळकरोडवर शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी रास्तारोको केला. शेतकऱ्यांची समजूत काढायला आलेल्या कृषी अधिकाऱ्यांनाच शेतकऱ्यांनी घेराव घालत जिल्हयात बियाण्यांचा काळाबाजार सुरु असल्याचा आरोप करीत बियाणे उपलब्ध करून देण्याची गळ घातली. तर धास्तावलेल्या कृषी केंद्र संचालकांनी दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत जोपर्यंत बंदोबस्त मिळत नाही तोपर्यंत दुकाने बंद ठेवणार असल्याचे सांगितले.

अगदी सुरुवातीपासून जिल्हयात बियाण्यासाठी शेतकऱ्यांकडून ओरड होत आहे. केवळ समजूत काढण्यापलीकडे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व जिल्हा कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील बियाणे विक्रीचा तिढा चांगलाच वाढला आहे.

आज मंगळवारी सकाळी शहरातील टिळक रोडवर विशिष्ट कपाशी वाणाची मागणी मोठ्या प्रमाणात कायम असून बाजारपेठेत हे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. कृषी विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांसमोर पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. त्यानंतर दुपारी शेतकऱ्यांनी आक्रमक होत रास्तारोको केला. बियाणे उपलब्ध असतानाही कृषी केंद्र संचालकांकडून नकारघंटा वाजवली जात आहे.

तर दुसरीकडे ७०० रुपयाचे बियाणे ब्लॅकमध्ये १४०० ते १७०० रुपयाला मिळत असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला. दरम्यान शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. दुसरीकडे विक्रेत्यांनीही दुकाने बंद ठेवत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आपली भूमिका मांडली.

विक्रेत्यांनी बंद केली प्रतिष्ठाने

बियाणे खरेदीवरून विक्रेते व शेतकऱ्यांमध्ये शाब्दीक वाद होऊन हमरीतुमरीचे प्रकार वाढले आहेत. सातत्याने घटना वाढत असल्याने विक्रेत्यांनी मंगळवारी दुपारपासून बियाणे विक्री थांबवली आहे. या प्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपली भूमिकाही मांडली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी विक्रेत्यांसोबत संवाद साधला.

उपलब्ध असलेले बियाणे शेतकऱ्यांना विक्री करण्याची त्यांनी सूचना केली. तर जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही, पोलिस बंदोबस्त मिळत नाही, तोपर्यंत विक्री करण्यास विक्रेते असमर्थ असल्याचे अकोला जिल्हा कृषि व्यावसायिक संघाने स्पष्ट केले आहे.

‘त्या’ बियाण्याची मागणी अधिक

जिल्हयात यंदाच्या हंगामात बियाणे विक्रीला सुरवात झाली तेंव्हापासून कपाशीच्या एका विशिष्ट वाणासाठी प्रचंड गदारोळ तयार झालेला आहे. संबंधित कंपनीच्या वाणाची वाढीव दराने विक्री झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या. त्यानंतर प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याची नेमणुक करीत विक्री सुरु ठेवली. काही ठिकाणी गर्दी वाढल्याने पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला.

मागणी जास्त व बियाण्याच्या पाकिटांचा पुरवठा कमी असल्याने कंपनीने दिलेला साठा संपुष्टात आला. आता बाजारपेठेत बियाणे शिल्लक नसल्याने पेच तयार झाला. जो काही थोडाबहुत साठा शिल्लक आहे, तो मिळवण्यासाठी शेतकरी चढाओढ करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्हयात पोलिस बंदोबस्त व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बियाणे विक्री केली जात आहे. काही ठिकाणी विक्रेत्यांसोबत हमरी तुमरीसारखे प्रकारही होत आहेत. हा सर्व प्रकार थांबवण्यात कृषि विभागाची यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT