RBI 
अर्थविश्व

बँकिंग घोटाळ्यांमुळं दररोज होतंय १०० कोटींच नुकसान - RBI

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : गेल्या सात वर्षात भारतात झालेल्या बँक घोटाळ्यांचे मोठे आणि गंभीर परिणाम भारताला सध्या भोगावे लागत आहेत. भारतातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) याबाबत माहिती दिली आहे. या घोटाळ्यांमुळं भारताचं दररोज १०० कोटींचं नुकासान होतं आहे, असं आरबीआयनं म्हटलं आहे. (India loses Rs 100 crore to banking fraud every day)

आरबीआयकडील डेटाच्या माहितीनुसार, या बँक घोटाळ्यांमधील एकूण रक्कमेमध्ये दर वर्षाला घट होत असली तरी भारताच्या तिजोरीचं दररोज १०० कोटी रुपयांचं नुकसान होतं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र या यादीत अव्वल स्थानावर आहे. जिथं घोटाळ्यातील ५० टक्के पैशाचा समावेश आहे. त्यानंतर दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्ये मिळून सुमारे २ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे बँक घोटाळे झाले आहेत. एकूणच ८३ टक्के पैसा हा या आर्थिक घोटाळ्यांमध्ये आहे. या सर्व राज्यांमध्ये मिळून १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात २.५ लाख कोटी रुपयांचे बँकिंग घोटाळे समोर आले आहेत. पण, अर्थ मंत्रालयानं असंही म्हटलं आहे की, बँकिंग घोटाळ्यांसंदर्भात त्वरित अहवाल आणि प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दरवर्षी फसवणुकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

आरबीआयनं या बँक घोटाळ्यांची आठ विविध प्रकारांमध्ये विभागणी केली आहे. यामध्ये गैरवापर आणि गुन्हेगारी विश्वासाचे उल्लंघन, बनावट साधनांद्वारे फसवं रोखीकरण, हिशोबाच्या पुस्तकांमध्ये फेरफार किंवा काल्पनिक खात्यांद्वारे मालमत्तेचे रूपांतरण, बक्षीस किंवा बेकायदेशीर तृप्तीसाठी वाढवलेली अनधिकृत क्रेडिट सुविधा, निष्काळजीपणा आणि रोख कमतरता, फसवणूक आणि फसवणूक, परकीय चलन व्यवहारातील अनियमितता आणि इतर कोणत्याही प्रकारची फसवणूक (वरीलप्रमाणे विशिष्ट शीर्षकाखाली येत नाही) या प्रत्येक श्रेणी अंतर्गत घोटाळ्यांची माहिती यापूर्वी सहज उपलब्ध होत नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT