Akhilesh Yadav esakal
देश

Akhilesh Yadav On EVM: यूपीत ८० जागा जिंकल्या तरीही ईव्हीएमवर भरवसा नसेल; लोकसभेत असं का म्हणले अखिलेश यादव?

Akhilesh Yadav On EVM Latest News : लोकसभेमध्ये राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ईव्हीएमवर कडाडून टीका केली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात दमदार यश मिळविणारे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज संसदेमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर तोफ डागली. ”इव्हीएमवर आपल्याला कालही विश्वास नव्हता आणि आजही विश्वास नाही. जोपर्यंत इव्हीएम हटविले जात नाही तोपर्यंत समाजवादी पक्ष या मुद्द्यावर ठाम राहील", असाही दावा अखिलेश यादव यांनी केला.

लोकसभेमध्ये राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ईव्हीएमवर कडाडून टीका केली . ते म्हणाले, की निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या काळात काही जणांवर सरकार आणि निवडणूक आयोग मेहेरबान होते. त्यामुळे कुठे ना कुठे या संस्थेवर (निवडणूक आयोग) प्रश्नचिन्ह लागले आहे. ही संस्था (निवडणूक आयोग) निष्पक्ष राहिल्यास आपली लोकशाही निकोप राहील. मात्र, आपल्याला ईव्हीएमवर कालही विश्वास नव्हता आजही विश्वास नाही. सर्व ८० जागा जिंकल्या तरीही ईव्हीएमवर भरवसा नसेल, निवडणुकीत सांगितले होते की ईव्हीएमद्वारे जिंकून ईव्हीएम हटविण्याचे काम केले जाईल. ईव्हीएमचा मुद्दा मेलेला नाही हा मुद्दा संपणार नाही. जोपर्यंत ईव्हीएम जात नाही तोपर्यंत समाजवादी मंडळी शांत बसणार नाही.

रामजन्मभूमी अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबादमध्ये भाजपच्या पराभवावरूनही अखिलेश यादव यांनी कोपरखळी लगावली. अयोध्येतील (समाजवादी पक्षाचा) विजय हा मतदारांच्या परिपक्वतेचा विजय आहे, असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावताना अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशाच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपला जोरदार फटकारले.

डबल इंजिनाच्या नावाखाली उत्तर प्रदेशला संघर्षाखेरीज काहीही मिळाले नाही. उत्तर प्रदेशात सर्व परिक्षांचे पेपर फुटल्याचा दावा करताना अखिलेश यादव म्हणाले की सरकार बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाही. म्हणूनच जाणीपूर्वक पेपर फोडत आहे. अग्नीवीरची चिंता आजही कायम आहे, असे सांगताना इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर अग्नीवीर योजना हटविण्यात येईल अशीही टिप्पणी अखिलेश यादव यांनी केली. राष्ट्रपती अभिभाषणात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेचा उल्लेख नसल्याचा उल्लेख करताना अखिलेश यादव यांनी ही योजना लागू केली जावी, अशी मागणी केली.

दरम्यान, संसदेबाहेरही पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव यांनी ईव्हीएमवर शरसंधान केले. ईव्हीएम हटविण्यावर विरोधातील तत्वापासून हटणार नाही. विजयानंतरही आम्हाला जाणीव आहे, की ईव्हीएमद्वारे निष्पक्ष निवडणूक होत नाहीत, अशी टिप्पणी अखिलेश यादव यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT