Old Rajender Nagar incident Esakal
देश

विद्यार्थी तळघरात होते, काही मिनिटांत 12 फूट पाणी भरले... UPSC कोचिंग सेंटर दुर्घटनेची ए टू झेड स्टोरी

आशुतोष मसगौंडे

दिल्लीत एक मोठा अपघात घडला असून, ओल्ड राजेंद्रनगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात 12 फूट पाणी साचल्याने यात बुडून 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

दरम्यान कोचिंग सेंटरमध्ये इतके पाणी कसे भरले, याबाबतचे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, तळघरात बांधलेल्या लायब्ररीत सुमारे 30-35 विद्यार्थी उपस्थित होते. काल सायंकाळी 7 वाजता लायब्ररी बंद झाल्यानंतर बाहेर पडतानाच समोरून अतिशय दाबाने पाणी येत होते. आम्ही लायब्ररी रिकामी केली तोपर्यंत ती गुडघाभर पाण्यात होती.

आत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, आम्हाला पायऱ्या चढता येत नव्हत्या. 2-3 मिनिटांत संपूर्ण तळघर 10-12 फूट पाण्याने भरले. तिथून बाहेर पडण्यासाठी दोर टाकण्यात आले, पण पाणी इतके घाण होते की काहीच दिसत नव्हते. तेथून एक एक करून मुलांना बाहेर काढले जात होते. माझ्या मागे आणखी दोन मुली होत्या असे विद्यार्थिनीने सांगितले. ज्या बाहेर येऊ शकल्या नाहीत.

गेटमधून पाण्याचा प्रचंड दाब येत होता, आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तीव्र दबावामुळे आम्ही पायऱ्या चढू शकलो नाही. पाणी एवढ्या वेगाने भरत होते की 2 ते 3 मिनिटांत संपूर्ण छतापर्यंतचे तळघर पाण्याने भरले होते.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा अपघात काल सायंकाळी 7 वाजता झाला. यापूर्वीही इथे पाणी साचले होते, आठवडाभरापूर्वी ते पाण्याने भरले होते त्यामुळे आम्हाला वरच्या बाजूलाच थांबवण्यात आले.

पाणी तुंबण्याची परिस्थिती अशी आहे की अनेक वेळा आमचे क्लास रद्द केले जातात, ते 2 ते 2.5 तास पाण्याने भरलेले असते. मागच्या वेळी जेव्हा आम्ही क्लासला आलो होतो तेव्हा सकाळी दहाच्या सुमारास आम्हाला तळघरात जाण्याची परवानगी दिली नव्हती, कारण अनेक विद्यार्थ्यांच्या गाड्या पाण्यात तरंगत होत्या.

दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी या अपघाताबाबत सांगितले की, नाला किंवा गटार फुटल्यामुळे तळघरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ते म्हणाल्या की, एमसीडी अधिकाऱ्याची चूक निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास ?

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

Kashedi Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद; काय आहे कारण?

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

SCROLL FOR NEXT