Bangal sakal
देश

Bengal : ‘यूपी’त बांगडी उद्योगालाही उष्णतेच्या झळा

पीटीआय

फिरोझाबाद (उत्तरप्रदेश) - राजधानी दिल्लीसह उत्तरभारतावर सूर्य अक्षरशः आग ओकू लागला असून याचा मोठा फटका पारंपरिक अर्थकारणाला देखील बसू लागला आहे. उत्तरप्रदेशातील ‘सिटी ऑफ ग्लास’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिरोझाबादसह अन्य जिल्ह्यांतील बांगडी उद्योग देशभर प्रसिद्ध आहे पण या उद्योगालाही आता उष्णतेचे चटके सोसावे लागत आहेत.

बांगडी उद्योगात काम करणाऱ्या कामगारांमध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ लागल्या असून ते आता पारंपरिक उद्योग सोडण्याचा गांभीर्याने विचार करू लागले आहेत. तब्बल एक हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगात पाच लाख कामगार काम गुंतले आहेत.

महिलांच्या हाताचे सौंदर्य खुलविणाऱ्या चमकदार बांगड्यांचा जन्म हा धगधगत्या भट्टीत होतो. वितळलेली काच ही जाड ट्यूबमध्ये ओतली जाते त्यानंतर तिला थंड करून तिचे विशिष्ट आकाराचे तुकडे करण्यात येतात. या तुकड्यांना पुन्हा तापवून त्यांना विशिष्ट गोलाकार देण्यात येतो. हे सगळे करण्यासाठी कामगारांना सतत उष्णतेच्या संपर्कामध्ये राहावे लागते.

गेल्या अनेक पिढ्यांपासून बांगडी निर्मितीच्या उद्योगात काम करणारे अस्थव देव म्हणाले, ‘उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी झाल्याने मला महिन्याभरात दोनदा रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागले. आणखी किती काळ मी हे काम करू शकेल याची शाश्वती नाही. बांगडी उद्योगात काम करणे हे एखाद्या भट्टीत काम करण्यासारखे आहे.’’

भविष्य अज्ञात

‘याआधी कामगार ही उष्णता सहन करू शकत होते पण आता बाहेरील उष्माही वाढत असल्याने हे आव्हान अधिक बिकट झाले आहे. आमच्यातील अनेकजण काम करताना आजारी पडतात पण नाइलाज असल्याने ते काम करत राहतात. भविष्यात आम्ही आणखी किती काळ काम करत राहू हे आम्हाला ठावूक नाही,’ असेही देव यांनी नमूद केले.

तापमान जाते ५० च्या पुढे

बांगड्या निर्मितीचा कारखाना हा आकाराने लहान असतो. अनेक ठिकाणी हवा खेळती राहावी म्हणून योग्य व्यवस्थाही केलेली नसते, अनेक कारखान्यांतील शीतकरण प्रणाली बंद आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वर्कशॉपमधील तापमान हे ५० अंश सेल्सिअसच्याही पुढे जाते. उन्हाळ्यामध्ये अशा उष्ण स्थितीत काम करणे शक्य नसते असे कामगारांचे म्हणणे आहे.

महिलांची अग्निपरीक्षा

पुरुषांपेक्षाही महिला कामगारांसमोर मोठी आव्हाने असतात कारण बांगड्या गरम असतानाच त्यांना त्यावर कलाकुसर करावी लागते. अनेक महिला कामगार या अर्ध्यातच बेशुद्ध पडतात. उन्हाळ्यामध्ये काम करणे आमच्यासाठी अधिक आव्हानात्मक असते असे रिनाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे कारखाना मालकही या महिला कामगारांना पुरेशी भरपाई देत नाहीत.

उष्णतेमुळे आम्हाला वारंवार रुग्णालयात दाखल व्हावे लागते. सलाईन लावून घेण्यासाठीही पैसे नसतात. आम्हाला या कामातून तीनशे रुपये मजुरी मिळते, अशा स्थितीमध्ये आम्ही शुल्क कसे भरावे?

- कमलेश, स्थानिक कामगार

कामगारांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्यांना थंड पाण्याचा पुरवठा करतो. पंखे आणि कुलरची सोय करण्यात येते. सरकारने देखील आम्हाला मदत करायला हवी.

- ओंकार सिंह, नटराज बँगल फॅक्टरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT