Vijay Wadettivar 
देश

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजपनं निवडणूक आयोगात तक्रार दिली आहे. वडेट्टीवार यांनी 26/11च्या मुंबई हल्ल्यावर भाष्य करताना शहिदांचा अपमान केला असून त्यांचं हे विधान आचारसंहितेचं उल्लंघन करणारं असल्यानं त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी यातून करण्यात आली आहे. (BJP files complaint against Congress leader Vijay Wadettiwar over his statement on Mumbai attack)

भाजपनं निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?

महोदय,

महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबाबत गंभीर चिंतेची बाब तुमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी हे लिहित आहे, ज्याने महत्त्वपूर्ण वाद निर्माण केला आणि निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेवर प्रश्न उपस्थित केले. नुकत्याच जाहीर केलेल्या निवेदनात वडे‌ट्टीवार यांनी आरोप केला की, आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना दहशतवा‌द्याने गोळ्या घातल्या नाहीत, तर आरएसएस समर्थीत पोलीस अधिकाऱ्याने घातल्या. निवडणुकीच्या काळात केलेल्या या निराधार दाव्यात मतदारांची दिशाभूल करण्याची आणि अशांतता निर्माण करण्याची क्षमता आहे. शिवाय वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्यूमागे भाजपनं उभे केलेले उमेदवार उज्ज्वल निकम यांना दोषी ठरवून त्यांची व पक्षाची बदनामी केली आहे.

परंतू, 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला केस (अजमल कसाब) याची प्रथम सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली व सर्व पुरावे, साक्षी तपासून न्यायालयाने आरोपी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर आरोपी अजमल कसाब याला कन्फर्मेशन केस उच्च न्यायालयात दाखल केली. या अपीलामध्ये सुनावणी होऊन अजमल कसाब याची फाशी कायम केली व सर्वोच्च न्यायालयानेही अजमल कसाब याची फाशी कायम केली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडे‌ट्टीवार यांनी जे देशद्रोही विधान केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे व न्यायालयाचा अवमान देखील आहे. (Latest Marathi News)

या आरोपांमध्ये पुराव्यांचा अभाव तर आहेच पण राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेही दिसते. अशा कृती निष्पक्ष प्रचाराच्या तत्वांचं उल्लंघन करतात आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग करतात अशा विधानांद्वारे आपल्या सशस्त्र दलांच्या व पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपसथित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे व राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील मुद्यांवरुन राजकारण केलं आहे. या व्यतिरिक्त, लोकशाही प्रक्रियेची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी, तसेच निवडणूक चर्चा नागरी आणि तथ्यात्मक राहील याची खात्री करण्यासाठी योग्य कारवाई केली पाहिजे. (Marathi Tajya Batmya)

वरील बाबींच्या अनुषंगानं मी निवडणूक आयोगाला आणि सन्मानीय अधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि योग्य ती कारवाई करण्याची विनंती करतो. आपली लोकशाही निःपक्ष आणि पारदर्शक निवडणुकांवर भरभराटीला येते आणि आपल्या निवडणूक प्रक्रियेची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी अशा घटनांना तत्परतेने प्रतिबंध करणे अत्यावश्यक आहे. तरी याबाबत आपण तातडीने निःपक्ष चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, ही विनंती. (Latest Maharashtra News)

भाजपचे निवडणूक विधी विभागे सहसंयोजक अॅड. शहाजी शिंदे आणि अॅड. मनोज जयस्वाल यांच्यावतीनं हे पत्र निवडणूक आयोगाला लिहिण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT