S. Jaishankar  sakal
देश

S. Jaishankar : भारताच्या धोरणांमध्ये ‘आसियान’ला महत्त्व,जयशंकर यांचे प्रतिपादन; सहकार्य वाढविण्याची गरज व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

व्हिएनटाइन (लाओस) : भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणामध्ये आणि हिंद-प्रशांत क्षेत्राबाबतच्या धोरणामध्ये ‘आसियान’ गटाला अत्यंत महत्त्व असून या गटातील सदस्य देशांमध्ये राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज केले.

लाओसची राजधानी व्हिएनटाइन येथे ‘असोसिएशन ऑफ साऊथ-ईस्ट एशियन नेशन्स’ (आसियान) दहा देशांच्या संघटनेची परिषद सुरू झाली असून यामध्ये जयशंकर हे भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मागील वर्षी जाकार्ता येथे झालेल्या या गटाच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

त्यावेळी मोदींनी जाहीर केलेल्या १२ मुद्द्यांच्या आराखड्यावर भारताने अंमलबजावणी सुरू केली असल्याचे जयशंकर यांनी आज परिषदेत सांगितले. जयशंकर म्हणाले,‘‘भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणात आसियान गटाला प्रचंड महत्त्व आहे. या धोरणावर भारताने हिंद-प्रशांत धोरण आखले आहे. या गटातील देशांनी एकमेकांशी असलेले राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत करणे आावश्‍यक आहे. सदस्य देशांमधील जनतेचाही एकमेकांशी संपर्क वाढणे गरजेचे आहे.’’ भारत आणि आसियान गटातील भागीदारीचे दिवसेंदिवस महत्त्व वाढत आहे, असे सांगत जयशंकर यांनी समाधानही व्यक्त केले. भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या धोरणाद्वारे भारताने आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांबरोबर आर्थिक, धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे.

‘आसियान’ गटात इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया या देशांचा समावेश आहे.

विविध देशांबरोबर चर्चा

‘आसियान’च्या निमित्ताने जयशंकर यांनी विविध देशांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. ब्रुनेई आणि न्यूझीलंड यांच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर चर्चा करताना जयशंकर यांनी सहकार्य वाढविण्याच्या मुद्द्यावर भर दिला. सिंगापूर, फिलिपिन्स, लाओस देशांच्या नेत्यांबरोबरही चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT