Facts About Indian Emergency 1975 Esakal
देश

Emergency 1975: सुमारे 50 वर्षांपूर्वी 'असा' झाला होता लोकशाहीवर हल्ला; जाणून घ्या आणीबाणीबाबतच्या '5' गोष्टी

आशुतोष मसगौंडे

भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर केल्याच्या घटनेला 25 जून रोजी 49 वर्षे पूर्ण होत आहेत.

राज्यघटनेच्या कलम 352(1) अंतर्गत राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी 'अंतर्गत अशांततेचे' कारण मान्य करत अधिकृतपणे आणीबाणी जारी केली होती.

ही आणीबीणी तब्बल 21 महिने चालली. 25 जून 1975 पासून ते 21 मार्च 1977 पर्यंत कालावधी भारतीय लोकशाहीसाठी कसोटीचा होता.

मध्यरात्री राष्ट्रपतींकडून स्वाक्षरी

७० वर्षीय जेपी उर्फ ​​जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या नारेने संपूर्ण देश हादरला होता. आणीबाणीच्या त्याच दिवशी दुपारी जेपींनी दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठी सभा घेतली होती, ज्यात लाखोंच्या संख्येने लोक जमले होते.

महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराशी झगडणाऱ्या लोकांच्या मनात संतापाची लाट उसळत होती. यावर मात करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी मध्यरात्री घटनेच्या कलम 352 चा वापर करून आणीबाणी जाहीर केली.

विशेष म्हणजे मध्यरात्री यासाठी राष्ट्रपती फखरुद्दीन यांची स्वाक्षरी घेण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आणीबाणी लागू होण्यापूर्वी इंदिराजींनी आपल्या मंत्रिमंडळाला याची माहितीही दिली नव्हती.

50 लाख लोकांजी जबरदस्ती नसबंदी

आणीबाणीतील सर्वात काळी घटना म्हणजे नसबंदी, ज्यामध्ये 50 लाखांहून अधिक लोक बळी पडले. 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. यानंतर सरकारने नसबंदी मोहीम आणली.

देशातील आणीबाणीमुळे सरकारला कोणतेही धोरण राबविण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. नसबंदी मोहिमेची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती पण या मोहिमेची सर्व जबाबदारी संजय गांधी यांच्यावर आली. संजय गांधी यांनी ही मोहीम अत्यंत क्रूर पद्धतीने पुढे नेल्याचे मानले जाते.

संजय गांधी यांनी युवक काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी दर महिन्याला दोन जणांची नसबंदी करून घेण्याची अट ठेवल्याचे वृत्त आहे. या कारणास्तव लोक जबरदस्तीने नसबंदी करू लागले. आणीबाणीमुळे सरकारला खूश करण्यासाठी अधिकाऱ्यांनीही भयानक नसबंदी केली.

किशोर कुमार यांच्यावर बंदी

आणीबाणीच्या काळात कोणत्याही सामान्य किंवा विशेष नागरिकाला कोणतेही अधिकार नव्हते. सरकारने आपल्या परीने लोकांचे हक्क ठरवले होते.

दरम्यान गायक किशोर कुमार यांनी युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात येण्यास नकार दिला आणि त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील त्यांच्या कार्यक्रमांच्या प्रसारणावरही बंदी घालण्यात आली होती.

अन् आणीबाणी उठली

18 जानेवारी 1977 रोजी, गांधींनी नवीन निवडणुकांची घोषणा करत सर्व राजकीय कैद्यांची सुटका केली आणि आणीबाणी अधिकृतपणे 23 मार्च 1977 रोजी संपली. विरोधी जनता चळवळीच्या मोहिमेने भारतीयांना इशारा दिला की निवडणुका "लोकशाही आणि हुकूमशाही यापैकी एक निवडण्याची त्यांची शेवटची संधी असू शकते. "

काँग्रसचे पानीपत

मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत, इंदिरा गांधी आणि संजय गांधी या दोघांनीही त्यांच्या लोकसभेच्या जागा गमावल्या. बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या उत्तरेकडील राज्यांमधील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागल. काँग्रेस पक्षातील अनेक निष्ठावंतांनी इंदिरा गांधींची साथ सोडली.

त्या निवडणुकीत जनता पक्षाने 298 जागा तर त्यांच्या मित्रपक्षांनी 47 जागा जिंकल्या आणि मोरारजी देसाई हे भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT