congress sonia gandhi rahul gandhi esakal
देश

INDIA Alliance : ''इंडिया आघाडी जिंकली तर ४८ तासात पंतप्रधान बनणार अन् NDA मधल्या घटकपक्षांना...'', काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

संतोष कानडे

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळालं तर ४८ तासांमध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करुन शपथ दिली जाईल, असं विधान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलं आहे. आघाडीमध्ये ज्याला जास्त जागा मिळतील, पंतप्रधान पदासाठी त्यांचीच दावेदारी अधिक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जयराम रमेश यांनी पीटीआयला मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये काँग्रेसचे महासचिव रमेश यांनी इंडिया आघाडीला २७२ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पुढे म्हटलं की, इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येत असेल तर NDA मधील इतर पक्ष आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांना आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमांड करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणुकीनंतर नितीश कुमार आणि टीडीपी अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू यांसारख्या नेत्यांना इंडिया आघाडीचे दरवाजे उघडे असतील का? या प्रश्नाचं उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले की, नितीश कुमार हे पलटी मारण्यात तरबेज आहेत. नायडू २०१९ मध्ये काँग्रेससोबत आघाडीत होते. ज्या पक्षांकडे इमानदारी आणि माणुसकी शिल्लक आहे, त्यांना इंडिया आघाडीत स्थान दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजप सीईसीची बैठक

SCROLL FOR NEXT