नवी दिल्ली - भाजपचा ‘चारशे पार’चा फुगा फोडणारा आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीला बळ देणारा निकाल देत मतदारांनी देशात एकहाती वर्चस्वाला पूर्णपणे नाकारले. १८ व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदारांनी बहुमताच्या काठावर नेऊन ठेवले, तर इंडिया आघाडीला सत्तेचे क्षितिज दाखवले.
काँग्रेसला शंभराच्या जवळपास जागा मिळाल्याने त्यांना संजीवनी मिळाली आहे. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात, तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये, काँग्रेसने राजस्थानमध्ये आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मारलेल्या मुसंडीने भाजपच्या किल्ल्याला खिंडार पाडत, ते अजिंक्य नाहीत, याची जाणीव करून दिली.
देशातील जनताजनार्दनाने ‘एनडीए’वर सलग तिसऱ्या वेळेस विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या स्नेह आणि आशीर्वादासाठी मी माझ्या परिवारातील सर्वांना नमन करतो. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवी ऊर्जा, नवा उत्साह आणि नव्या संकल्पासह पुढे जाऊ, असे मी जनतेला आश्वासन देतो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
ही लढाई भाजपबरोबरच सीबीआय, ईडी, न्यायपालिका या संस्थांच्या रक्षणासाठी होती. मोदी व शहांनी या संस्था आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे ही लढाई राज्यघटना वाचविण्यासाठीही होती. त्यासाठी आम्हाला जनतेने, विशेषत: गरीब, दलित, वंचित आणि आदिवासींनी चांगली साथ दिली आणि राज्यघटना वाचविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.