Lalu Prasad Yadav and Narendra Modi 
देश

Lalu Yadav: ऑगस्टपर्यंतच चालणार मोदी सरकार; लालू प्रसाद यादव यांचा दावा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचा आज २८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेते कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी भाषण करताना लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला, तसेच सध्याचं केंद्र सरकार हे कमजोर सरकार असल्याचं सांगताना ऑगस्टपर्यंतच हे सरकार चालणार असल्याचा दावा केला आहे. (Modi government will last till August Claim of RJD leader Lalu Prasad Yadav)

लालू यादव म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार खूपच कमजोर आहे. याच वर्षी ऑगस्टपर्यंतच हे सरकार चालणार आहे. मी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं अपिल करतो कारण निवडणुका कधीही लागू शकतात.

दरम्यान, आपल्या वडिलांच्या विधानावर सहमती दर्शवताना म्हटलं की, केंद्र सरकार पाच वर्षे पूर्ण करणार नाही. कारण नितीश कुमार २०२४ मध्ये किंवा २०२५ मध्ये विधानसभा निवडणुका घ्याव्यात यावेळी राजदच राज्यात सरकार बनवेल. थोडी अधिक मेहनत केली तर जास्त जागा आपण जिंकू. यावेळी तेजस्वी यादव यांनी आरोप केला की, आपल्याला १० ते १२ जागांवर हरवण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT