Manoj Tiwari and Kanhaiya Kumar sakal
देश

North East Delhi Loksabha Election : दंगलीचा फटका नेमका कुणाला?

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या जातीय दंगलीच्या फटका बसलेला बहुतांश भाग ईशान्य लोकसभा मतदारसंघात येतो.

हा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. या मतदारसंघाचे पहिल्यांदा प्रतिनिधित्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश अग्रवाल यांनी केले. परंतु २०१४ व २००१९ मध्ये या मतदारसंघात भाजपने आपली भक्कम पकड केली आहे. पूर्वांचली, मुस्लिम, दलित आणि उत्तर प्रदेशातून कामासाठी आलेल्या कामगारांचा या मतदारसंघांवर प्रभाव आहे.

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांनी गेल्या दहा वर्षांत या मतदारसंघावर चांगलीच पकड मिळवली आहे. तिवारी हे यावेळीसुद्धा पूर्वांचली मतदारांच्या भरवशावर अवलंबून आहे. तर काँग्रेसनेसुद्धा बिहारमधील मूळ असलेले व विद्यार्थी चळवळीतून राजकीय जीवनात प्रवेश केलेले कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीने भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

२०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीच्या आठवणी अजूनही या मतदारसंघांत ताज्या आहेत. याचा परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. या भागात मुस्लिम मतदारांची संख्या २३ टक्के आहे. त्याचप्रमाणे दलित मतदारांची संख्या १६ टक्के आहेत.

या मतदारांवर काँग्रेसची सारी भिस्त आहे. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचा आमदारही येथे नसल्याने येथे काँग्रेसचे संघटन कमजोर असल्याचा फटका कन्हैया कुमार यांना बसत आहे.

या भागातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघात आपचे आमदार असले तरी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा तेवढासा सहभाग नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र कन्हैया कुमार यांचा प्रचार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT