बंगळूरुः देशातील विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे झाली होती. आता दुसरी दोन दिवसीय बैठक बंगळूरु येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये देशातील २६ विरोधी पक्षनेते सहभागी झाले होते. याबैठकीनंतर विरोधकांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन पुढील रणनीती विषद केली.
माहिती देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, पाटण्याच्या बैठकीमध्ये १६ विरोधी पक्ष एकत्रित आलेले होते. मात्र आजच्या बैठकीमध्ये २६ पक्ष एकत्रित आलेले आहेत. देशात भाजप सरकारने लोकशाहीविरोधी कारवाया केलेल्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांच्या आघाडीला 'इंडिया' असं नाव देण्यात आलेलं आहे.
खर्गे पुढे म्हणाले की, विरोधकांची पुढची बैठक मुंबईमध्ये होणार आहे. त्याच बैठकीत ११ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ती नावं मुंबईत जाहीर करण्यात येतील आणि ही समिती पुढचे निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे मुंबईतीली बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जागा वाटपासंदर्भातील अधिकार या समन्वय समितीला असणार आहेत. विरोधाकांच्या आघाडीचं एक सचिवालय दिल्लीमध्ये उभं करण्यात येणार आहे.
दुसरीकडे दिल्लीत एनडीएची बैठक संपन्न होत आहे. आमच्यासोबत ३८ पक्ष आहेत, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलाय. महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे, अजित पवार हेदेखील एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.