PM Modi Rajya Sabha Speech
PM Modi Rajya Sabha Speech Esakal
देश

PM Modi Speech: 'प्रपोगंडा ते संविधान...' पंतप्रधानांच्या राज्यसभेतील भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे

आशुतोष मसगौंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मंगळावारी लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले होते.

काँग्रेसला परजीवी म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधी सदस्य वेलमध्ये उतरत घोषणाबाजी करत राहिले. विरोधकांच्या गदारोळात आणि घोषणाबाजीत पंतप्रधानांनी आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले.

यावेळी पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यातील 10 महत्त्वाच्या मुद्यांचा आढावा घेणार आहोत.

"काही लोकांना जनादेश समजला नाही"

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले की, अनेक दशकांनंतर एखाद्या सरकारला सलग तिसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, अजूनही काही लोकांना जनादेश समजला नाही.

"आमची आणखी 20 वर्षे बाकी आहेत"

निकाल आल्यापासून आमचे एक सहकारी वारंवार ढोल बडवत होते की, आमचे सरकार एकतृतीयांश पक्षांचे आहे. आमची सत्ता येऊन 10 वर्षे उलटली असून आणखी 20 वर्षे बाकी आहेत.

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

संविधानाबाबत ओरड करणाऱ्यांना संविधानाचा आत्मा कळाला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सांगितले. काँग्रेसने संविधान दिनालाही विरोध केल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, 'माझ्यासारखे अनेक जण आहेत, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे येथे येण्याची संधी मिळाली आहे.

संविधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'जेव्हा आमच्या सरकारने लोकसभेत 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, जे लोक संविधानाची प्रत घेऊन फिरत आहेत त्यांनी प्रजासत्ताक दिन असताना, संविधान दिनाची काय गरज? असा प्रश्न केला होता.

आज संविधान दिनाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेचा आत्मा, राज्यघटनेच्या निर्मितीमागील भूमिका काय होती, कोणत्या कारणांसाठी देशाच्या मान्यवरांनी संविधान बनवताना काही गोष्टी वगळण्याचा आणि काही गोष्टी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, याविषयी शिकवले जाते.

संविधानावरील विश्वासाची व्यापक भावना जागृत केली पाहिजे आणि संविधानाची समज विकसित झाली पाहिजे. संविधान हीच आपली प्रेरणा राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

"जनतेने प्रपोगंडाचा पराभव केला"

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'या निवडणुकांमध्ये देशातील जनतेच्या बुद्धिमत्तेचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी प्रपोगंडाचा पराभव केला. जनतेने सत्य परिस्थितीला प्राधान्य दिले. फसवणुकीचे राजकारण त्यांनी नाकारले आणि विश्वासाच्या राजकारणावर विजयाचा शिक्का मारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Closed: ठाणे, नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं निर्णय

Rain Update: पुन्हा पावसाला सुरूवात; मुंबईसह राज्यासह या भागात 'रेड अलर्ट', हवामान विभागाने दिला सर्तकतेचा इशारा

मुलींच्या मोफत शिक्षणाचा जीआर निघाला! ईडब्ल्यूएस, ओबीसी व एसईबीसी प्रवर्गातील मुलींनाच १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कमाफी

CNG -PNG Price: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; CNG-PNGच्या दरात होणार वाढ, जाणून घ्या नवे दर

Russia-Ukraine War: रशियाने कीवमध्ये मुलांच्या रुग्णालयावर डागलं क्षेपणास्त्र, 24 जणांचा मृत्यू; अनेक मृतदेह गाडले, बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT