Robert Clive esakal
देश

Robert Clive : इंग्रज कारकून ज्याने भारताची लूट केली आणि युरोपमधला सर्वात श्रीमंत माणूस बनला

असं म्हणतात भारताला लुटण्यात त्याचा सर्वात मोठा वाटा होता

सकाळ डिजिटल टीम

Robert Clive : असं म्हणतात भारताला लुटण्यात त्याचा सर्वात मोठा वाटा होता. ही लूट त्याने ब्रिटिश सरकारच्या तिजोरीत जमा केली आणि स्वतःची तिजोरीही भरली. काही दिवसांतच तो युरोपमधला सर्वात श्रीमंत माणूस बनला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले.

वय फक्त 18 वर्षे. ब्रिटनमधून एक तरुण भारतात कारकून म्हणून आला होता. मद्रास बंदरावरील ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीला सुरुवात केली. नंतर आपल्या कौशल्याने तो सैन्यात दाखल झाला आणि बंगाल प्रांताचा दोनदा गव्हर्नर झाला. फ्रान्सशी लढला, मुघलांशी लढला, राजांशी लढला आणि सर्वांवर नियंत्रण ठेऊन ब्रिटिश राजवटीत सर्वोच्च पदावर पोहोचला. त्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाइव्ह.

भारताला लुटण्यात त्याचा सर्वात मोठा वाटा होता असे म्हणतात. त्याने ही लूट ब्रिटिश सरकारच्या तिजोरीत जमा केली आणि स्वतःची तिजोरीही भरली. काही वेळातच तो युरोपमधला सर्वात श्रीमंत माणूस बनला. त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. चौकशीही झाली. अशा या शक्तिशाली व्यक्तीने वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी जगाला निरोप दिला.

निष्काळजी विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आले

रॉबर्ट क्लाइव्हचा जन्म 29 सप्टेंबर 1725 रोजी झाला. सुरुवातीपासून तो अभ्यासात निष्काळजी होता पण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती. त्याला खेळात जास्त रस होता. त्याला अनेकवेळा शाळेतून काढून टाकण्यात आले. जसजशी समज वाढली तसतसा त्याचा खोडकरपणा कमी झाला आणि त्याचा अभ्यासही चांगला झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1743 मध्ये त्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत कारकून म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो मद्रास बंदरावर तैनात होता.

चार वर्षांनंतर त्याला सशस्त्र दलात कमिशन मिळाले आणि तो लष्करी अधिकारी झाला. हळुहळु त्याच्या नेतृत्व क्षमता प्रकट होऊ लागल्या. ब्रिटिश अधिकारी त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. सुरुवातीला त्याने फ्रेंच सैनिकांशी युद्ध केले आणि त्यांचा पराभवही केला. अवघ्या काही वर्षांत सतत विजय मिळवून क्लाईव्हचा उत्साह इतका वाढला होता की 1757 साली 50 हजार सैनिकांच्या सैन्याविरुद्ध केवळ 3200 सैनिकांसह युद्धात भाग घेतला. ही लढाई प्लासीची लढाई म्हणून ओळखली जाते. त्याच्या आयुष्यातील हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला कारण या युद्धानंतर ब्रिटनने बंगालवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. लवकरच तो ब्रिटीश सरकारच्या जवळ आला. भारतातील ब्रिटिश राजवट मजबूत करण्यात त्याचे नाव नेहमीच आघाडीवर राहिले आहे.

करारानंतर लढाई जिंकली

सिराज-उद-दौलाला त्याचा सेनापती मीर जाफरमुळे प्लासीचा युद्धात पराभवाला सामोरे जावे लागले. पुढे ब्रिटिशांनी मीर जाफरला बंगालचा नवाब बनवले. युद्धात जाण्यापूर्वी मीर जाफरशी केलेल्या करारानंतर क्लाइव्हने ही लढाई जिंकली होती. मीर जाफरला युद्धात इंग्रजांना मदत करायची होती आणि त्या बदल्यात त्याला बंगालचा नवाबी मिळवायची होती, जी त्याला नंतर मिळाली. इंग्रज एकाच वेळी दोन आघाड्यांवर जिंकले, प्लासीची लढाई आणि बंगालवर राज्य करण्याचा अधिकार... कारण मीर जाफर हा केवळ नावापुरता नवाब होता.

खरी सत्ता इंग्रजांच्या हाती होती. त्यामुळेच भारतात देशद्रोहाच्या प्रकरणात कोणाचही नाव घेतले की मीर जाफरची भूमिका अग्रभागी असल्याचे म्हटले जाते. अनेक युद्धे जिंकल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीतील भ्रष्टाचार आणि अराजकता नष्ट करण्याचे आव्हान त्याच्यासमोर होते. त्याला बऱ्याच अंशी यश आले. त्याला क्लाइव्ह ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जायचं.वॉरन हेस्टिंग्जसोबतच राजकीय वर्चस्व मिळवण्यातही त्याचा मोठा वाटा होता. लष्करी अधिकारी म्हणून आपली कारकीर्द सुरू करणारा क्लाइव्ह मेजर जनरल म्हणून ब्रिटिश भारताचा कमांडर इन चीफ या पदापर्यंत पोहोचला. या काळात क्लाइव्हने सुमारे दीड डझन युद्धांत भाग घेतला. त्याचे लष्करी व राजकीय कौशल्य पाहून ब्रिटिश सरकारने त्याला बंगालचा गव्हर्नर बनवले.

इंग्रजांचा खजिना लुटीने भरला?

एकदा रॉबर्टच्या वरिष्ठाने विचारले की भारतातून किती संपत्ती लुटली गेली. यावर त्याचे उत्तर होतं की, ही संपत्ती किती वेळा, कुठून आणि एकूण किती लुटली हे मला अजिबात आठवत नाही पण मी अंदाज बांधू शकतो. जहाजात एकावेळी 70 हजार किलो माल जातो आणि मी नऊशे जहाजं भरून सोने, चांदी आणि इतर महागड्या वस्तू लुटून ब्रिटनला दिल्या आहेत. यावरून असाही अंदाज लावला जाऊ शकतो की भारताला सोन्याचा पक्षी का म्हणतात?

1760 मध्ये तो पुन्हा इंग्लंडला गेला आणि त्यानंतर 1764 मध्ये त्याला गव्हर्नर म्हणून पाठवण्यात आले. मग क्लाईव्ह लुटीच्या मार्गावर चालू लागला, तिजोरी भरत राहिला आणि ब्रिटिश राजवटीचा पाया मजबूत करत गेला. इतिहास वाचल्यावर असे दिसून येते की ब्रिटीशांनी क्वचितच थेट लुटीचा अवलंब केला. ते लहानमोठे राजे आणि नवाबांमध्ये फूट पाडायचे आणि नंतर ज्याला पाठिंबा देतील त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे. आणि हा क्रम अखंड चालू राहिला. प्रत्येक राजा आणि नवाब गरीबांना लुटून इंग्रजांच्या तिजोरीत देत.

क्लाइव्हने घालून दिलेले फूट पाडा आणि राज्य करा हे तत्त्व त्यानंतरच्या प्रत्येक ब्रिटिश अधिकाऱ्याने पाळले. 1767 मध्ये क्लाइव्हने भारत सोडला तेव्हा तो परत आलाच नाही. त्याच्यावर इंग्लंडमध्ये भ्रष्टाचाराचा खटला चालवण्यात आला. जरी, तो निर्दोष सुटला असेल तरी तो मनातून खचला होता.

क्लाईव्हचा मृत्यू आजही एक गूढच आहे. काही ठिकाणी आत्महत्येची तर काही ठिकाणी नैसर्गिक मृत्यूची माहिती मिळते. मात्र, आत्महत्येकडे सर्वाधिक लक्ष वेधले जाते. लहान वयात इतकं काही साध्य करूनही, खटल्यामुळं तो दु:खी झाला होता आणि अखेर वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT