Nitish Kumar trusted leader-Important role in alliance with BJP-Who is Sanjay Jha-bihar marathi news
Nitish Kumar trusted leader-Important role in alliance with BJP-Who is Sanjay Jha-bihar marathi news 
देश

Sanjay Jha: संजय झा यांची जेडीयूच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती; बिहारमध्ये नव्या राजकारणाला सुरुवात

Amit Ujagare (अमित उजागरे)

पाटणा : जनता दल युनायटेड अर्थात जेडीयू या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी संजय झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. (Sanjay Jha appointed as JDU working president New politics started in Bihar)

दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये पार पडलेल्या जेडीयूच्या बैठकीत खुद्द नितीश कुमार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी संजय झा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यानंतर सर्वसंमतीनं झा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि घोषणा झाली. त्यानंतर झा यांचं सर्वच वरिष्ठ नेत्यांनी स्वागत केलं.

कोण आहेत संजय झा?

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर इथल्या अरडिया या गावचे संजय झा हे रहिवासी आहेत. जेडीयूमध्ये येण्यापूर्वी संजय झा हे भाजपत होते. ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधीत्व करणारे झा हे मिथिलांचलमध्ये जेडीयूचे मोठे नेते मानले जातात. ते सध्या राज्यसभा खासदार आणि पक्षाच्या संसदीय पक्षाचे नेते आहेत. संजय झा यांनी २०१४ मध्ये दरभंगा इथून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा इथं पराभव झाला होता. त्यानंतर ते विधानपरिषदेवर निवडून आले आणि २०१४ पासून २०२४ पर्यंत बिहार सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.

बैठकीनंतर जेडीयूचे नेते अशोक चौधरी यांनी सांगितलं की, जेडीयू आणि भाजपच्या युतीची जबाबदारी संजय झा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. झा यांचे भाजपसोबत चांगले संबंध आहेत. याद्वारे राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत लढताना महत्वाच्या गोष्टी पदरात पाडून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

संजय झा यांच्यापूर्वी जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, नितीश कुमार, आरपीसी सिंह, ललन सिंह यांनी जेडीयूच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

विशेष राज्याची मागणी कायम

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत महत्वाची चर्चा पार पडली. यामध्ये बिहारला विशेष दर्जा आणि विशेष पॅकेजची आमची जुनी मागणी आजही कायम असल्याचं अशोक चौधरी यांनी सांगितलं. येणाऱ्या काळात आमचे सर्व वरिष्ठ नेते पंतप्रधानांना भेटून आपली ही मागणी प्रभावीपणे मांडतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maternity Leave: सरोगसीद्वारे आई झालेल्या महिलांना मॅटेरनिटी लीव्हचा अधिकार आहे का? हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

ऋषी सुनक यांचा पराभव करणाऱ्या पक्षाचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात होता महत्त्वाचा रोल, काय आहे नेहरू कनेक्शन

Iran's New President: कट्टरपंथी इराणच्या अध्यक्षपदी पुरोगामी पेझेश्कियान; जाणून घ्या इथून पुढे कसे असणार भारत-इराण संंबंध

Ashadhi Wari 2024 : चांदीच्या मेघडंबरीत विसावली विठुमाउली; नांदेडच्या भाविकाकडून तब्बल 2 कोटी 45 लाखांची चांदी अर्पण

Maharashtra Live News Updates : संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा विसाव्यासाठी नीरा नदीकाठी

SCROLL FOR NEXT