Jayaprakash Narayan sakal
देश

Jayaprakash Narayan: जे.पीं.च्या ‘संपूर्ण क्रांती’च्या घोषणेचा यंदा सुवर्णमहोत्सव

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : बिहारची राजधानी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर ५ जून १९७४ रोजी समाजवादी नेते जयप्रकाश नारायण (जेपी) यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा दिली होती. समोर उपस्थित प्रचंड जनसमुदायाला उद्देशून त्यांनी आम्हाला संपूर्ण क्रांतिव्यतिरिक्त काहीही नको, अशी गर्जना केली होती. त्यांच्या या ऐतिहासिक आंदोलनामुळे देशात मोठे वादळ निर्माण झाले होते. आंदोलनाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याने स्मृती ताज्या होत आहेत.

पाटण्यातील चित्र पाच दशकांनंतर बरेच बदलले असून ‘जेपी’ नावाने लोकप्रिय असलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या स्मृती आजही राजकीय भाषणे, त्यांचे पुतळे, पूल, सार्वजनिक इमारती आणि काही रस्त्यांना दिलेल्या नावांतून दिसते. फायरब्रॅंड नेते असलेल्या जेपींच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने बिहारमध्ये संपूर्ण क्रांतीने आकार घेतला. सुरुवातीला केवळ राज्यातील तत्कालीन गफूर मंत्रालयाच्या बरखास्तीची मागणी अखेरीस थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजीनाम्याच्या व्यापक मागणीत बदलली. या ७० च्या दशकातील बिहार आंदोलनाची परिणिती ‘आणीबाणी’त झाली.

पाटणा जिल्हा प्रशासनाने ‘लोकनायक’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या जयप्रकाश नारायण यांना आदरांजली वाहिली. नारायण यांच्या गांधी मैदानाकडे चेहरा असलेल्या पुतळ्यावर पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कवी रामधारी सिंह दिनकर यांनी नारायण आणि त्यांच्या सामाजिक न्यायाच्या संघर्षावर लिहिलेल्या काव्यपंक्तीही पुतळ्याच्या चबुतऱ्यावर आहेत. त्या काव्यपंक्ती फारच प्रेरणादायी आहेत, त्या कांव्यपंक्ती अशा -

सेनानी करो प्रयाण अभय,

भावी इतिहास तुम्हारा है;

ये तख्त आभा के बुझते हैं,

सारा आकाश तुम्हारा है

पाटण्याच्या मध्यवस्तीतही प्राप्तिकर चौकात जेपींचा आणखी एक आकर्षक पुतळा लक्ष वेधून घेतो. काही वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या विमानतळाला जयप्रकाश नारायण यांचे नाव दिले आहे. गंगा नदीवरील जेपी सेतू, उत्तर बिहारमधील छाप्रातील जयप्रकाश विद्यापीठ त्यांच्या स्मृती जागवीत आहे. कांकरबागेतील लांबलचक रस्ताही जेपी सेनानी पथ म्हणून ओळखला जातो. दिल्ली-पाटणा रेल्वेचेही संपूर्ण क्रांती एक्स्प्रेस नामकरण करण्यात आले आहे.

सुधीरकुमार झा यांनी आपल्या ‘ए न्यू डॉन; पाटणा रेईकार्निटेड’ या पुस्तकात जेपींच्या आंदोलनावर सविस्तर भाष्य केले आहे. या पुस्तकात उद््धृत केल्याप्रमाणे, ५ जून १९७४ रोजी नारायण गांधी मैदानावर उपस्थित प्रचंड जनसमुदायाला उद्देशून म्हणाले, की मित्रांनो, ही क्रांती आहे. आपण येथे केवळ विधानसभा विसर्जित करण्यासाठी नाही जमलो. तो तर आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे. आपल्याला आणखी प्रदीर्घ वाटचाल करायची आहे. देशातील जनता उपासमार, महागाई, भ्रष्टाचार तसेच सर्व प्रकारच्या अन्यायाने पिचली आहे. त्यामुळे, आम्हाला आता संपूर्ण क्रांती हवी आहे.

आंदोलनाचे वणव्यात रूपांतर

बिहारची राजधानी पाटण्यात सुरू झालेल्या या आंदोलनाने ठिणगीचे वणव्यात रूपांतर व्हावे, त्याप्रमाणे देशाची राजधानी दिल्लीलाही कवेत घेतले. दिल्लीतील रामलीला मैदानावरही जेपींनी मोठ्या सभेला संबोधित केले.

छायाचित्रकाराने जागविल्या आठवणी

आंदोलनावेळी २१ वर्षांचा असलेल्या व पाटणा विद्यापीठात शिकणाऱ्या तसेच गांधी मैदानाजवळ राहणाऱ्या राजीव सोनी यांनी आंदोलनाच्या आठवणी जागविल्या. ते म्हणाले, आमच्या घरासमोरील रस्त्यांवर प्रचंड संख्येने लोक जमले होते. ते सर्व गांधी मैदानाकडे जात होते. तसेच पोलिसही मोठ्या प्रमाणावर होते. पालकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT