UP Politics sakal
देश

UP Politics : उत्तर प्रदेशात ‘नावाच्या पाटी’ने राजकारण तापले;कावड मार्गावरच्या हॉटेल, ढाबा मालकांना नाव लावणे बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : योगी आदित्यनाथ सरकारने कावड मार्गावर भोजनाची आणि खाद्यपदार्थांची सोय उपलब्ध करून देणाऱ्या दुकानांवर मालकाचे आणि तेथे काम करणाऱ्यांचे नाव ठळकपणे लिहिण्याचा आदेश काढल्यानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण तापले आहे. एवढेच नाही तर राष्ट्रीय नेते देखील टीका करत आहेत. नव्या आदेशानुसार राज्यातील सर्वच कावड मार्गावर खाद्य पदार्थांच्या दुकानांच्या मालकाला स्वत:चे आणि तेथे काम करणाऱ्यांना नाव लिहावे लागणार आहे. या आदेशामुळे कावड मार्गावरील दुकान मालकांनी नाव बदलण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने कावड मार्गावर असलेल्या खाद्य पदार्थाच्या दुकानांवर नावाची पाटी लावणे बंधनकारक केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कावडधाऱ्यांचे पावित्र्य आणि श्रद्धा जपण्यासाठी योगी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. देशभरात विरोध होत असतानाही कावड मार्गावर खाण्यापिण्याच्या दुकानांवर नावाची पाटी लावण्याचा निर्णय लागू करण्यावर योगी सरकार ठाम राहिले आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मंत्री कपिल देव अग्रवाल म्हणाले, हा फेरीवाल्यापुरती मर्यादित विषय नाही.

हरिद्वार आणि गोमुख येथून पाणी आणण्यासाठी २५० ते ३०० किलोमीटर पायी प्रवास करतात. यादरम्यान कावड मार्गावर हिंदू देव देवतांच्या नावावर ढाबा, हॉटेल दिसतात, मात्र त्याचे मालक अन्य धर्माचे असतात. कावडधारी या हॉटेलमध्ये जातात आणि जेवण करतात. मात्र तेथे मांसाहाराची विक्री होताना दिसते. अशावेळी त्यांच्या पावित्र्याला आणि श्रद्धेला ठेच पोचते. यावर तत्काळ बंदी घालायला हवी आणि त्या दुकान मालकाची आणि कर्मचाऱ्याची ओळख सार्वजनिक व्हायला हवी. मांसाहार विक्रीवर आमचा आक्षेप नाही. मात्र हिंदू देव देवतांच्या नावावर दुकान सुरू करून मांसाहाराची विक्री करू नये, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसप नेत्या मायावती, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका करत योगी सरकारचा निर्णय धार्मिक आणि भेदभाव निर्माण करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार साकेत गोखले यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांची भूमिका योग्य नसून हा आदेश अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीला सापत्न वागणूक देणारा आहे, असे म्हटले आहे.

संगम ढाबा झाला सलीम भोजनालय

येत्या २२ जुलैपासून कावड यात्रा सुरू होणार असून तत्पूर्वी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील कावड मार्गावरील हॉटेल आणि ढाबा मालकांना नाव बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय मार्गावरील एका चहा टपरीचे नाव चाय लवर पॉइंट असे हेाते. मात्र पोलिसांच्या आदेशानंतर आता वकिल अहमद टी स्टॉल असे ठेवण्यात आले आहे. संगम ढाब्याचे आता सलीम भोजनालय झाले आहे. फळविक्री करणाऱ्या फेरीवाल्यांचीही नावे झळकत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT