Deven Thakur 
देश

Devesh Chandra Thakur: "मतं दिली नाहीत त्यामुळं मुस्लिमांची काम करणार नाही"; खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

Amit Ujagare (अमित उजागरे)

पाटणा : लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये काही उमेदवार निवडून आले तर काही पडले. पण असं असलं तरी निवडून आलेला खासदार हा संपूर्ण मतदारसंघाचा खासदार असतो. त्याला कोणी मतं दिलं असेल किंवा नसेल पण या खासदारानं सर्वांसाठी कामं करणं अपेक्षित आहे.

पण याच तत्वाला हरताळ फासणारा एका खासदाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये हा खासदार म्हणतोय की आपण मुस्लिमांची काम करणार नाही कारण त्यांनी मला मतं दिली नाहीत. (Wont work for Muslims and Yadav community because they didnt vote me says Devesh Chandra Thakur video goes viral)

देवेश चंद्र ठाकूर असं या खासदाराचं नाव असून तो जनता दल युनायटेड या पक्षाचा आहे. बिहारच्या सीतामढी या लोकसभा मतदारसंघातून तो निवडून आला आहे. या खासदारानं यादव आणि मुस्लिमांवर नाराजी व्यक्त केली आहे. येणाऱ्या काळात मी या दोन समाजांसाठी काम करणार नाही त्यांना केवळ चहा-पाणी देऊन पाठवून देणार!

कारण मी गेल्या २२ वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे या काळात मी सर्वाधिक काम हे यादव आणि मुस्लिम समाजासाठी केलं होतं. पण यंदा त्यांनी कुठल्याही कारणाशिवाय मला मतं दिली नाहीत. जर या समाजांतील कोणाचं माझ्याकडं काम असेल तर त्यांनी माझ्याकडं यावं चहा-नाश्ता करावा आणि आपलं कुठलंही काम होईल की नाही याची खात्री न बाळगता निघून जावं.

नाराजी आली उफाळून

सीतामढी इथं शिक्षक संघाच्यावतीनं आयोजित अभिनंदनाच्या कार्यक्रमात बोलताना खासदार देवेशचंद्र ठाकूर यांची नाराजी उफाळून आली आणि मंचावरुन आपण आता यादव आणि मुस्लिमांसाठी कोणतंही काम करणार नसल्याचं म्हटलं.

एनडीएच्या मतांचं का झालं विभाजन?

देवेशचंद्र ठाकूर यांनी म्हटलं की, एनडीएच्या मतांमधून किती मतांचं विभाजन झालं? याचं कोणतंही योग्य कारण समोर आलेलं नाही. सुरी आणि कलवार समाजाची अर्ध्याहून अधिक मतांचं विभाजनं झालं आहे. याचं काय कारण आहे सांगा? कुशवाहा समाजाची मत अचानक कमी झाली. ही सर्वतर एनडीएची मत होती. कुशवाहा समाजाचे लोक केवळ यासाठी खुश आहेत कारण लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या समाजाच्या ७ जणांचा तिकीट दिलं होतं.

कुशवाहा समाजावर सोडलं टीकास्त्र

कुशवाहा समाज किती स्वार्थी आहे असं म्हणताना या सामाजाचा भाजपमधून उपमख्यमंत्री आहे. त्यामुळं हेच उपमुख्यमंत्री उपेंद्र कुशवाहा जर जिंकले असते तर आज केंद्रीय मंत्री बनले असते. कुशवाहा समाजातून पाच किंवा सात लोक खासदार जरी बनले असले तरी सीतामढीला त्याचा काय फरक पडला असता? सीतामढीचे लोक त्यांच्याकडून काम करुन घेण्यासाठी गेले असते का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT