महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असली तरी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने अद्यापही राज्यातील सर्व २८८ जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत वाद सुरूच असून चर्चेतून प्रश्न सुटणार असल्याचा दावा दोन्ही आघाड्यांनी केला आहे.
२० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात २८८ जागांवर मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने एकवटले आहेत. यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या स्वरूपात लढवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या युतीतील विविध पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे.
महाविकास आघाडीने आतापर्यंत २८८ जागांपैकी केवळ २३९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्याचवेळी महायुतीने २१५ उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही आघाड्यांच्या जवळपास एक चतुर्थांश जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. महायुतीने अद्याप ७३ जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत तर महाविकास आघाडीने ४९ जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
यामध्ये काँग्रेसकडून ८७, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून ८५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून ६७ जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर महायुतीकडून २१५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने सर्वाधिक १२१ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून ४५ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ४९ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.