Raj Thackeray addressing the media about toll exemption and MNS's role in upcoming elections esakal
Maharashtra Assembly Election

Raj Thackeray: टोल माफी आमचीच मागणी होती...राज ठाकरेंचा शंखनाद! विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केली भूमिका

Sandip Kapde

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापलं आहे. विविध पक्षांनी आपल्या तयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मनसेची भूमिका स्पष्ट करत टोल माफी, निवडणुका, आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केलं.

विधानसभा निवडणुकीत मनसेची ताकद

राज ठाकरे यांनी विधानसभेत निवडणुका लढवण्याची आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली. "मी निवडणुका जोरात लढवणार आहे, सहज म्हणून काहीही बोलणार नाही," असं स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. "माझ्या भाषणांमधून लोकांचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढावा, यासाठी मी मुद्दे मांडले आहेत. या निवडणुकांमध्ये आम्ही जिंकू आणि सत्ता आणू," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

राज ठाकरे यांनी लवकरच पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची घोषणाही केली. त्यांच्या मते, मनसेच्या मुद्द्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हा पक्ष विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहे.

टोल माफीवर राज ठाकरेंची भूमिका-

राज ठाकरे यांनी टोल माफीच्या मुद्द्यावर भाष्य करत, "टोल माफी ही आमचीच मागणी होती. काँग्रेस सरकारच्या काळापासून आम्ही टोल माफीसाठी आवाज उठवला होता," असं सांगितलं. "सरकारने हा निर्णय घेतला, याचं लोकांना समाधान आहे. मात्र, हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं वाटू नये," असा इशारा त्यांनी दिला.

"अनेक राजकीय नेते श्रेय घेण्यासाठी पुढे येतील, पण प्रत्यक्षात निर्णय घेण्याची गरज आहे," असं सांगत त्यांनी टोल माफीच्या निर्णयाचं स्वागत केलं.

राज ठाकरेंनी असंही सांगितलं की, "अनेक राजकीय पक्षांनी टोल नाके बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यापैकी काहींनी फक्त बोलून दाखवलं, प्रत्यक्षात काहीच केलं नाही." राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर मनसेच्या लढ्याचं महत्व स्पष्ट केलं आणि सांगितलं की, "सर्वाधिक लढा मनसेनेच दिला आहे."

सरकारकडून धोरणात्मक त्रुटींचं संकेत-

राज ठाकरे यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली. "आज सरकारकडे पैसे नाहीत, तरीही वाट्या वाट्या सुरू आहेत. हे राज्य कंगाल होईल," असा गंभीर इशारा देत, त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली.

मनसेच्या दौऱ्याची तयारी-

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "आता आमचे दौरे सुरू होणार आहेत." निवडणुकीच्या तयारीसाठी मनसे कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन करत, त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्याचं आश्वासन दिलं. मनसेची भूमिका आणि राज ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेतील भाषणामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असं दिसतं.

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना पटोलेंचं उत्तर; म्हणाले, महायुती...

Assembly Elections: महायुतीत जागावाटपाचा पेच वाढणार? देवेंद्र फडणविसांना पत्र, रामदास आठवलेंकडून 'इतक्या' जागांची मागणी

Nikki Tamboli : "ते सगळं फेक.." निक्की बनली अरबाजचं नातं तुटण्याचं कारण ? निक्कीकडूनच खुलासा

Ajit Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'ती' कृती अन् विधान;अजित पवारांना मान खाली घालून हसू आवरेना

"अभिनेत्रींनी चेहऱ्यावर बोटॉक्सचा भडीमार करणं चुकीचं" ; मर्डर फेम मल्लिका शेरावतने व्यक्त केली चिंता , कास्टिंग काऊचबद्दल म्हणाली

SCROLL FOR NEXT