Sharad Pawar Prakash Ambedkar Esakal
Maharashtra Assembly Election

Sharad Pawar: शरद पवारांना अडचणीत आणणाऱ्या आंबेडकरांच्या पत्रात काय? विधानसभेच्या निकालांवर होऊ शकतो परिणाम

आशुतोष मसगौंडे

Vidhan Sabha Election Maharashtra 2024: राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आंदोनल, उपोषणे करत आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचे नाही असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते विरोध करत आहेत.

अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. शरद पवारांच्या सहभागी होण्याची मी वाट पाहत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले आहे.

शरद पवारांचा निर्णय ठरवणार विधानसभेचे भविष्य?

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना ओबीसी वचाव यात्रेचे निमंत्रण देत आंबेडकरांनी शरद पवारांना अडचणीत आणले आहे. कारण जर शरद पवार या यात्रेत सहभागी झाले तर मराठा समाज नाराज होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये सहभागी नाही झाले तर ओबीसी समाज नाराज होण्याची शक्यता आहे.

या कठीण परिस्थितीत शरद पवार आंबेडकरांच्या पत्राबाबत काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण येत्या तीन महिन्यांत राज्यात विधान सभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही सामुदायाला नाराज करणे पवार यांना परवडणारे नाही. त्यामुळे त्यांचा आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हायचे की नाही याबाबतचा एक निर्णय विधानसभा निवडणुकांचे भविष्य ठरवेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनाही ॲड. आंबेडकर यांनी निमंत्रित केले होते. ॲड. आंबेडकर यांचे निमंत्रण स्वीकारून हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ही यात्रा मुंबई येथून 25 जुलै रोजी निघणार असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना आणि औरंगाबाद येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT