Monsoon Health Tips esakal
आरोग्य

Monsoon Health Tips : पावसाळ्यात तंदूरुस्त अन् निरोगी रहायचे असेल तर ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Health Tips : सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परंतु, काही भागांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात उकाडा आहे. महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून कोकणासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

या पावसामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, पाऊस आला की सोबत थंडी आणि आर्द्रता घेऊन येतो. त्यामुळे, वातावरणात सतत बदल होत राहतात.

या बदललेल्या वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर, तुम्ही काही गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा. जर तुम्ही या दिवसांमध्ये आहाराची विशेष काळजी घेतली तर तुम्ही पावसाळ्यात ही निरोगी अन् तंदूरूस्त राहू शकाल. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

विविध प्रकारचे सूप

पावसाळ्यात विविध संसर्गांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे, अनेकांना सर्दी-खोकला, ताप यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे, या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही आहारात विविध प्रकारच्या सूप्सचा समावेश करायला हवा. ज्यामुळे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील. टोमॅटो सूप, मिक्स व्हेज सूप, डाळींचे सूप, स्वीट कॉर्न सूप इत्यादी प्रकारचे गरमागरम सूप अवश्य प्या. या दिवसांमध्ये गरमागरम सूप प्यायल्याने शरीर ऊबदार राहते आणि थंडीपासून संरक्षण होते.

नाश्ता हवा पौष्टिक

पावसाळ्यात सगळीकडे पाणी जमा झालेले असते. त्यामुळे, या दिवसांमध्ये अनेकांना चालायला, फिरायला जाता येत नाही. शिवाय, या दिवसांमध्ये आपली पचनक्षमता मंद झालेली असते. त्यामुळे, खाल्लेले अन्न नीट पचत नाही.

त्यामुळे, पावसाळ्यात हलका परंतु पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी, तुम्ही सकाळच्या नाश्त्याची सुरूवात पौष्टिक खाद्यपदार्थांनी करा. जसे की, मोड आलेली कडधान्ये, फळे, दूध, उपमा, पोहे, सूप इत्यादी खाद्यपदार्थ जेणेकरून तुम्ही दिवसभर तंदूरूस्त राहू शकाल.

ग्रीन टी महत्वाचा

या दिवसांमध्ये अधिक प्रमाणात चहाचे सेवन केले जाते. परंतु, जास्त प्रमाणात चहाचे सेवन करणे हे आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे, या दिवसांमध्ये चहाऐवजी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता.

यामुळे, तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT