heavy rain damage crop farmer esakal
जळगाव

Jalgaon Heavy Rain: खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती! परतीच्या पावसाचा फटका; चोपडा तालुक्यातील बळीराजा नुकसानीने चिंताग्रस्त

अमोल महाजन

धानोरा (ता. चोपडा) : परतीच्या पावसाने बळीराजाला मोठा फटका बसला आहे. शेतात काढणीला आलेल्या कापूस, मका, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात यावर्षी मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. (Kharif production feared to decline)

खरीप हंगामातील पिकांपासून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. परंतु, परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगल्या प्रकारे बरसला. त्यामुळे खरीप हंगाम चांगला होईल व पावसाचे पाणी वेळेत मिळाल्याने पिकांची वाढही चांगली झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला होता. परंतु, सध्या परतीच्या पावसाने सर्वत्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी हमखास चार पैसे मिळवून देतो. खरीप हंगामातील पिकांतून चांगली आर्थिक उलाढाल होत असते. सणासुदीसाठी हा हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. खरीप हंगामात येणाऱ्या पैशांतून शेतकऱ्याचा दसरा व दिवाळी सण अवलंबून असतो. खरीप हंगामासाठी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र बिघडून टाकले आहे. (latest marathi news)

बळीराजा आर्थिक विवंचनेत!

परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला, त्याचा फटका काढणीला आलेल्या पिकांना बसत असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हातातोंडाला आलेली पिके वाया जात असल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. यावर्षी वरुणराजाची सुरुवात समाधानकारक, पुरेसा व पिकाला चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरिपाचा हंगाम चांगलाच बहरला होता, कापसाचे पिक डोलू लागले होते.

परंतु, हातातोंडाशी आलेले पीक आता परतीच्या पावसावर आधारित असल्याने बळिराजा चिंताग्रस्त झाला आहे. जोरदार पावसामुळे शेतात उभे असलेले ज्वारी पीक काळे पडण्याची भीती असून, ज्वारीला मिळणाऱ्या दराला मोठा फटकाही बसणार आहे. खरीप हंगामासाठी घेतलेले खते, बियाणे मजुरी याचा खर्च वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

"परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेले कांदा पिकाचे नुकसान होऊ लागले आहे. टोमॅटो पिकाच्या उत्पादनावर पावसामुळे परिणाम होतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागणार, असे वाटते."

- नरेंद्र पाटील, प्रगतीशील शेतकरी, लोणी (ता.चोपडा)

"मी कापूस उत्पादक शेतकरी आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या कापसाचे बोंड गळून पडत आहे. त्यामुळे उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. म्हणून शासनाने पीकविमा मंजूर करून तत्काळ शेतकऱ्यांना भरपाई द्यावी."- प्रसन्न महाजन, प्रगतशील शेतकरी, धानोरा (ता.चोपडा).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Chennai Flood : चेन्नईला पावसाने झोडपले! शाळा महाविद्यालयांना सुटी; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Sports News on 15th October 2024: भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात ते कोल्हापूरच्या कन्येने जिंकले रौप्यपदक

SCROLL FOR NEXT