Unmesh Patil, Mangesh Chavan, Girish Mahajan, Eknath Khadse esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : भाजपमधील वर्चस्वाच्या संघर्षात पक्षांतराचा दुसरा अंक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत वादात मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांचे विधानसभेचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आता हाच वर्चस्वाचा वाद चाळीसगाव भाजपमध्ये निर्माण होऊन खासदार उन्मेश पाटील यांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आले. आता त्याच उन्मेश पाटील यांनी भाजपातून बाहेर पडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

अंतर्गत वर्चस्वाचा वाद आता भाजपला कोठे घेऊन जाईल याकडेच आता लक्ष आहे. जळगाव जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु पक्षाच्या अंतर्गत वाद होत राहिले आणि हळूहळू कॉंग्रेसमधून एकेकजण बाहेर पडला आणि कॉंग्रेस पक्ष जिल्ह्यात कमकुवत होत गेला. आता हाच कित्ता भारतीय जनता पक्षात गिरविला जात असल्याचे दिसत आहे.

जळगाव जिल्हा आजच्या स्थितीत भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. तब्बल दोन खासदार या ठिकाणाहून पक्षाचे निवडून जात आहेत. तर आज चार आमदार आहेत. एकेकाळी यापेक्षाही अधिक आमदार पक्षाचे निवडून जात होते. पक्ष वाढला म्हणजे नेतृत्वाची स्पर्धाही वाढते, तीच स्पर्धा जिल्ह्यातही झाली.

भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसेगिरीश महाजन यांच्यात वर्चस्वाचे अंतर्गत वाद निर्माण झाले. त्यातूनच पुढे ते वाढत गेले. अखेर विधानसभा निवडणूकीत एकनाथ खडसे यांची उमेदवारी कापली गेली. त्यानंतर त्यांची कन्या विधानसभेत पराभूत झाली. त्यामुळे खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. (Jalgaon Political News)

आता हाच वर्चस्वाचा वाद चाळीसगाव तालुक्यातही भाजप अंतर्गंत दिसून आला. भाजपचे खासदार उन्मेश पाटील व आमदार मंगेश चव्हाण हे एकेकाळचे जिवलग मित्र परंतु राजकारणात त्यांच्यात वाद झाले. गेल्या पाच वर्षात एकाच पक्षात राहून दोघे एकमेकांचे कट्टर शत्रु झाले. मंगेश चव्हाण यांनी भाजपतून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांच्यावर टीका करीत पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीत तर त्यांनी थेट खडसेंच्या पॅनलचा पराभव करून आपल्या नेतृत्वाखाली सत्ता मिळविली. त्यामुळे त्यांचे वर्चस्व वाढत गेले. चाळीसगावात तर खासदार पाटील व आमदार चव्हाण या दोघांमध्ये वर्चस्वाचा वाद होता हे संपूर्ण जळगाव जिल्ह्याला ठाऊक आहे. पुढे हा वाद वाढला.

खासदार उन्मेश पाटील यांची लोकसभेची उमेदवारी पक्षाने कापली. पक्षाच्या वरिष्ठांनी ही उमेदवारी वेगळ्या कारणाने कापली असली तरी त्यांच्या अंतर्गत वादाची किनार त्याला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र उमेदवारी कापली गेल्यानंतर खासदार उन्मेश पाटील यांना राजकारणात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. आता खासदारकीला संधी नाही.

पुढे आमदारकीला तर चाळीसगावातून मंगेश चव्हाण यांची उमेदवारी आहे. अशा स्थितीत राजकीय अस्तित्वाचा त्यांच्या पुढे निश्‍चित प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘आता नाही तर पुढे नाही’ या उक्तीनुसार त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊन खासदारकीचाही राजीनामा दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करुन आपले राजकीय अस्तित्व शोधले आहे.

त्यांच्यासोबत पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आणि उमेदवारीची माळदेखील त्यांच्या गळ्यात पाडून घेतली. आता उन्मेश पाटील हे मित्रत्वाची ताकद उभी करणार आहेत. त्यामुळे भाजपला जळगाव लोकसभेतच नव्हे; तर रावेर लोकसभेतही मोठे आव्हान असणार आहे.

त्यामुळे भाजपतील अंतर्गत वर्चस्वाचा जामनेर विरूध्द मुक्तानगरनंतर आता चाळीसगाव विरूध्द चाळीसगाव दुसरा अंकाचा पक्षातरांचा शेवट झाला आहे. यापुढे आता भाजप काय पाऊले टाकणार याकडेच लक्ष असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT