Damage to Bhagwati Kast's farm along Vadgaon road esakal
जळगाव

Jalgaon Rain Damage Crop : मुसळधारेमुळे कापूस पीकाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Damage Crop : अडावद (ता.चोपडा) येथील वडगांव रस्त्यालगत मुसळधार पावसामुळे पाण्याचा लोडा व ग्राम पंचायती तील तयार केलेल्या गटार फुटल्याने शेतातील कापूस व ठिबक नळ्या वाहून गेल्या. ट्युबेलचे नुकसान झाले. अडावद येथील भगवती कासट गट ४८५ महिलाचे वडगाव रोडा लगत शेत आहे त्यात त्यांनी पाच एकर मध्ये कापूस हे ठिबक सिंचनच्या साहायाने लागवड केली होती. (Rain Damage cotton crop due to heavy rain )

दोन तीन दिवसांपूर्वी रात्री पाऊस व अडावद ग्राम पंचायतीच्या गटारीच्या सांडपाण्याची व्यवस्था न केल्यामुळे संपूर्ण पाणी शेतात वाहून आल्यामुळे ते शेतात शिरले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे भगवती कासट यांच्या शेतातील कापूस व ठिबक नळ्या पूर्ण पणे वाहुन गेल्या. ट्युबवेलला छिद्र पडल्यामुळे केसिंग उघडी झाल्यामुळे ट्युबवेल सुद्धा जमिनीत आठ ते दहा खोल फुट गेल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले. (latest marathi news)

अडावद गावाचे संपूर्ण गटारीचेसांड पाणी या रस्त्यावरून जाते त्याची विल्हेवाट ग्रामपंचायतीने लावली पाहिजे मात्र ग्रामपंचायतीकडून गटारीचे काम होत नाही. साफसफाई होत नसल्याने त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. अडावद परिसरातील अनेक शेतकऱ्याचे मका कापूस केळी व नवीन टाकलेले कांद्याचे बियाने सुद्धा वाहून गेले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाच्या नळया वाहुन गेल्या. यात पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT