Dilapidation caused by standing water on roads in new settlements. esakal
जळगाव

Jalgaon News : पहिल्याच पावसात रस्ते ‘चिखलमय’! एरंडोल शहरातील नवीन वसाहतींच्या समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : शहरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे शहराबाहेर असलेल्या व पालिका हद्दीत समावेश केलेल्या सर्व नवीन वसाहतींमधील रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. (Jalgaon Roads muddy in first rain in Erandol town)

अनेक दुचाकी व चारचाकी वाहने चिखलात फसल्यामुळे चालक हैराण झाले होते. पालिकेतर्फे नवीन वसाहतींमध्ये निर्माण झालेल्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भेदभाव केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पालिकेतर्फे नवीन वसाहतींमध्ये गटारींचे बांधकाम आणि नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामांमुळे रस्त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. रस्त्यांवर खडीचा कच अथवा जाड मुरूम टाकून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.

शहरासह नवीन वसाहतींमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वत्र रस्त्यांचे खोदकाम करण्यात आल्याने रस्त्यांवर काळ्या मातीचा चिखल होत आहे. काही ठिकाणी गटारींचे काम सुरू असल्यामुळे समस्यांमध्ये वाढ झाली आहे. शहरात रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नवीन वसाहतींमधील रस्त्यांवर सर्वत्र चिखल, गारा व पावसाचे पाणी तुंबल्याने रहिवाशांना पायी चालणे देखील अवघड होत आहे.

रस्त्यांवर काळ्या मातीचा गारा झाल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने त्यामध्ये फसत असल्यामुळे चालक त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या पालकांच्या दुचाकी ठिकठिकाणी फसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. काळ्या मातीचा गारा दुचाकींच्या चाकात अडकत असल्यामुळे वाहन

चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, चिखलामुळे सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांना सहन करावा लागत आहे. रहिवाशांच्या दाराजवळच चिखल असल्यामुळे अनेकांना घरातच थांबून राहावे लागले. नवीन वसाहतींमधील रहिवासी पालिकेच्या करांचे दरवर्षी हजारो रुपये भरत असताना रहिवाशांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त केल्या जात आहेत. (latest marathi news)

नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू असताना देखील पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात आठ दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्याच पावसात नवीन वसाहतींमधील रस्ते खराब झाले असताना देखील पालिका प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याबद्दल रहिवाशांमध्ये पालिकेच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

धरणगाव रस्त्यावर असलेल्या लक्ष्मीनगरमध्ये सुमारे तीस वर्षांपासून गटारी नसल्यामुळे सर्व सांडपाणी परिसरातच तुंबत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ होऊन रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गुरुकुल कॉलनीमध्ये रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला असून, याकडे देखील पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले.

पालिकेला हवा पूर्णवेळी मुख्याधिकारी

पालिकेत सुमारे सहा महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नवीन वसाहतींमधील रस्त्यावरील चिखलाचा निचरा करून रस्त्यावरील खड्डे बुजवून खडीचा कच अथवा जाड मुरूम टाकून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी महिला व ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून पालिकेस कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT