A 28-foot tall bronze statue of Chhatrapati Shivaji Maharaj created by sculptor Jaydeep Apte in Malvan.  esakal
कोकण

Who is Jayeep Apte: पुतळा कोसळल्यावर काय म्हणाला शिल्पकार जयदीप आपटे? उभारणीचं काम त्याला कोणी दिलं होतं?

Sandip Kapde

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 फूट उंच पुतळ्याचा सोमवारच्या सकाळी अचानक कोसळला. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी 4 डिसेंबर 2023 रोजी नेवी डे निमित्त केले होते. पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

भारतीय नौसेनेने दिले तपासाचे आदेश

या घटनेनंतर भारतीय नौसेनेने पुतळा कोसळण्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पुतळ्याचे अनावरण गेल्या वर्षी नौसेना दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा कोसळण्यामागे जोरदार वारे कारणीभूत असल्याचे सांगितले.

या घटनेनंतर पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे. या पुतळ्याचे कंत्राट मेसर्स आर्टिस्ट्री नावाच्या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचे प्रोप्रायटर आणि शिल्पकार जयदीप आपटे आहेत, तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते.

शिल्पकार जयदीप आपटे कोण अन् काय म्हणाला?

वाईट झाल्यावर करणाऱ्यालाच जबाबदार धरण्यात येते. आपल्याकडे ती पद्धत झाली आहे. मी आता मालवणला निघालो आहे. कारण अजून स्पष्ट झालं नाही मला तिथं गेल्यावर कारण कळेल, असे जयदीप आपटे म्हणाला.

जयदीप आपटे २५ वर्षांचे युवा शिल्पकार असून, ते ठाणे जिल्ह्यातील कल्याणचे आहेत. त्यानी भारतीय नौसेनेच्या आदेशानुसार मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फूट उंच कांस्याचा पुतळा बनविण्याचे काम केले आहे. या कामासाठी त्याला अनेक आव्हाने आणि अडचणींचा सामना करावा लागला. शिल्पाची निर्मिती आणि त्याच्यातील तांत्रिक कौशल्यांची चर्चा सनातन प्रभात या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मुलाखतीत झाली होती.

पुतळ्याच्या निर्मितीचे आव्हान

२८ फूट उंच कांस्य पुतळा तयार करण्यासाठी साधारणतः तीन वर्षांचा कालावधी लागतो, परंतु जयदीप आपटे याने हे काम सहा महिन्यांत पूर्ण केलं. हे काम करण्यासाठी त्यानी ३ डायमेन्शनल प्रिंटिंगच्या तंत्राचा वापर केला. पुतळ्याचे जोडकाम ठिकाणीच करण्यात आले कारण तिथे जाण्यासाठी रस्ते अरुंद होते.

आता काय पुढे?

राज्य सरकारने या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय नौसेना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी जाऊन तपासणी करणार आहे. राज्यातील विविध विरोधी पक्षांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. आता राज्य सरकार आणि संबंधित अधिकारी या प्रकरणाचा योग्यरित्या तपास करतील आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT