कोकण

...तर आपण मराठी भाषा देखील विसरून जाऊ; राज ठाकरेंनी जनतेला केलं सावध!

कार्तिक पुजारी

रायगड- मनसेचे सहकार शिबिर कर्जमध्ये पार पडत आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकीय विषयांवर भाष्य केलं. गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. महानंदा डेअरी भविष्यात अमूल गिळंकृत करते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची स्थिती पाहता, महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाहीl, असं राज ठाकरे म्हणाले.

काही धोक्याचा सूचना मला द्यायच्या आहेत. आपल्याला इतिहासाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गोष्टी एकदा हातातून निघून गेल्यावर काहीही होणार नाही. मराठवाड्यातील विहिरीला ८०० ते ९०० फुटापर्यंत पाणी लागत नाहीये. अशी मराठवाड्यात परिस्थिती आहे. राजकारणामुळे मराठवड्यात साखर कारखाने उभारले जात आहेत. अशीच स्थिती राहिली तर पुढच्या चाळीस पन्नास वर्षात मराठवाड्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असं तज्त्र सांगतात.

भविष्याचा कोणताची विचार राजकारण्यांकडे नाही. वाळवंट झालेली जमीन पूर्ववत करायची असेल तर चारशे ते पाचशे वर्ष लागतील असं तज्ज्ञ सांगतात. नुसते जातीजातीमध्ये भांडण लावली जात आहेत. मराठी लोकांनी एकत्र राहू नये यासाठी बाहेरच्या लोकांचे प्रयत्न सुरु आहेत. पण, हे आपल्या लोकांना कळत नाहीत. जे चांगलंय ते घेऊन जा किंवा उद्धवस्त करा असं बाहेरचे लोक करत आहेत, असं ठाकरे म्हणाले.

आतापर्यंत जे युद्ध झाली त्याला इतिहास म्हटलं जातं. कोणताही इतिहास जमिनीशिवाय पूर्ण होत नाही. युद्ध म्हणजे जमीन मिळवणे. जमीन मिळवणे म्हणजे युद्ध करणे. आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे की आपल्या लोकांच्या जमिनी हळूवारपणे, कळू न घेता बळकावल्या जात आहेत, असं ते म्हणाले.

शिवडी न्हावा शिवा ब्रिज झाला आहे. पण, अशाप्रकारच्या ब्रिजमुळे आपल्या लोकांच्या हातून फक्त जमिनी गेल्या आहेत. उद्या आपल्या हाती रायगड जिल्ह्या देखील राहणार नाही. विमानतळ बनतयं, सर्व बाहेरचे लोक येऊन हे नाकावर टिच्चून बळकावणार. एकदा ते आले की त्यांना हुसकावता येणार नाही. काही काळाने तर आपण मराठी भाषा देखील विसरून जाऊ. त्यामुळे सतर्क व्हा. ही महाराष्ट्रातल्या विरोधातील सहकार चळवळ सुरु आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

आजचे राजकारणी लाचार झालेत, मिंधे झालेत. पैशाने वेडे झालेत. त्यांच्या पाठिला स्वाभिमान नाही, काही नाही. इकडून तिकडं जात आहेत. घरचे लोक देखील त्यांना विचारत असतील आज कोणत्या पक्षात आहात. या लोकांनी आपला स्वाभिमान गहाण टाकला आहे. मनसेकडून कधीही स्वाभिमान गहाण ठेवला जाणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT