Rajapur Flood Arjuna-Kodavali River esakal
कोकण

Arjuna-Kodavali River : गाळ उपसा सोडवणार राजापूरच्या पुराचा वेढा; अर्जुना नदीपात्राची खोली आणि रुंदीही वाढली

राजेंद्र बाईत

पाटबंधारे विभागातर्फे कोंढेतड पूल ते मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) अर्जुना नदीवरील पूल या पसिरातील अर्जुना नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्यात आला.

महसूल विभाग, राजापूर नगरपालिकेचे (Rajapur Municipality) सहकार्य आणि लोकसहभागातून नाम फाउंडेशनचा पुढाकाराने गतवर्षी अर्जुना-कोदवली नदीपात्रातील (Arjuna-Kodavali River) गाळ उपसा झाला होता. लाखो क्युबिक घनमीटर गाळ उपसा केल्याने नदीपात्राची खोली वाढली असून, रुंदावलेल्या पात्रामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये गतवर्षी राजापूरला कमी प्रमाणात पुराची झळ पोहचली होती. यावर्षीही पाटबंधारे विभागातर्फे कोंढेतड पूल ते मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) अर्जुना नदीवरील पूल या पसिरातील अर्जुना नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्यात आला. त्यामध्येही सुमारे एक लाख घनमीटर गाळाचा उपसा झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पूरस्थितीची तीव्रता किती असेल याची उत्सुकता लागली आहे.

नदीपात्राची रुंदी वाढली

गतवर्षी लोकसहभागातून झालेल्या गाळ उपशामुळे अर्जुना-कोदवली नद्यांची पात्रांची खोली वाढताना त्यांची रुंदीही वाढली होती. त्याप्रमाणे यावर्षी झालेल्या गाळ उपशामुळे अर्जुना नदीपात्राची रूंदी वाढली आहे. गाळ उपशापूर्वी अनेक ठिकाणी या नदीपात्राची सुमारे २५ ते ३० मीटर रुंदी होती. गाळ उपशानंतर तिचे नदीपात्र सुमारे ५० ते ६० मीटर रुंद झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गाळाने भरलेले अरुंद दिसणारे अर्जुना नदीचे पात्र आता मोकळे आणि विस्तीर्ण झाले आहे.

गाळ उपशाने बळकटी

यापूर्वी गाळामुळे नद्यांची पात्र अधिक उथळ झालेली असल्याने पुराचे पाणी वाढून त्याचा शहराला वेढा पडत होता. वाढलेली खोली आणि रुंदावलेल्या नदीपात्रांमुळे पावसाळ्यामध्ये वाढणारे पाणी सुरळीतपणे समुद्राकडे वाहून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तरीही अतिवृष्टीवेळी पूरस्थिती निर्माण झाली तरी पूर्वीसारखे पुराचे पाणी दोन-दोन दिवस राहण्याची शक्यता कमी आहे. गेल्यावर्षी गाळ उपशानंतर पुराच्या पाण्यामध्ये घट झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यावर्षी अर्जुना नदीपात्रामध्ये झालेल्या गाळ उपशाने त्याला अधिक बळकटी मिळणार आहे.

अर्जुना नदीतील गाळ उपसा

गतवर्षी कोदवली नदीतील नद्यांचा संगम परिसर असलेला बंदर धक्का ते आंबेवाडी परिसर इथपर्यंतच्या गाळाचा उपसा झाला होता. त्याचवेळी अर्जुना नदीपात्रातील संगम परिसर ते कोंढेतड पूल या परिसरातील सुमारे दोनशे मीटर परिसरातील गाळाचा उपसा झाला होता. त्यानंतर यावर्षी अर्जुना नदीपात्रातील कोंढेतड पूल ते अर्जुना नदीवरील मुंबई-गोवा महामार्गावरील पूल या दरम्यानचा शिल्लक राहिलेल्या गाळाचा उपसा करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये झालेल्या या कामामध्ये सुमारे १ लाख घनमीटर गाळाचा उपसा झाला आहे.

रुंदीकरणासाठी पिचींग फायदेशीर

अर्जुना नदीच्या काठावरील रस्ता वरचीपेठ भागामध्ये अरुंद आहे. त्यामुळे राजीव गांधी क्रीडांगणाच्या पुढील भागामध्ये दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास एकाचवेळी आपापल्या दिशेने ती पुढे जाणे मुश्कील होऊन जाते. मात्र, उपसा करून या भागातील नदी काठावर पिचींग करून ठेवलेल्या गाळामुळे हा रस्ता रुंद झाला आहे. पावसाळ्यानंतरही पिचींग केलेला गाळ या भागामध्ये राहिल्यास आणि त्याचा सकारात्मक दृिष्टकोनातून खुबीने उपयोग केल्यास या भागातील रस्ता रुंदीकरण होण्यास आगामी काळात निश्‍चितच फलदायी ठरेल. गाळ उपशामुळे वरचीपेठ परिसरामध्ये पुराचे वाढणारे पाणी कमी होण्यास वा पुराची तीव्रता कमी होण्यास एकप्रकारे मदत होणार आहे.

गाळ पात्रात येण्याचे प्रमाण कमी

अर्जुना-कोदवली नदीपात्रांमधील उपसा केलेल्या गाळाची अन्यत्र वाहतूक होणे गरजेचे होते, मात्र गाळ वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या पुरेशा निधीअभावी उपसा केलेल्या गाळाची अपेक्षित वाहतूक झालेली नाही. त्याऐवजी उपसा केलेला गाळ नदीपात्राकडे पिचींग करून ठेवलेला होता. नद्यांच्या पाण्याची पावसाळ्यातील तीव्रता आणि नदीचा उताराचा भाग पाहता पिचींग केलेला गाळ पुन्हा नदीपात्रामध्ये येण्याची शक्यता लोकांकडून वर्तविण्यात येत होती. त्याप्रमाणे गाळ पुन्हा नदीपात्रामध्ये आला आहे. काही प्रमाणात वाहूनही गेला आहे, मात्र गतवर्षी पिचींग केलेला गाळ मोठ्याप्रमाणात ‘जैसे थे स्थिती’मध्ये असल्याचे पाहता पिचींग केलेला गाळ पुन्हा नदीपात्रामध्ये येण्याचे प्रमाण अल्प दिसत आहे.

गाळ उपशाचा फायदा

  • दरवर्षीची पूरस्थिती आणि पुराची तीव्रता कमी होण्यास मदत

  • पावसाळ्यामध्ये वाढणारे पाणी सुरळीतपणे समुद्राकडे वाहून जाण्याचा मार्ग मोकळा

  • शहरासह शहर परिसरात लगतच्या गावांमध्ये दरवर्षी होणाऱ्‍या नुकसानीला बसणार ब्रेक

  • पूरस्थितीमुळे व्यापाऱ्यांना दरवर्षी बसणारी आर्थिक झळ कमी होणार

दृष्टिक्षेपात

  • अर्जुना-कोदवली नदीपात्रामध्ये गाळाचा संचय

  • अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ संचयामुळे दरवर्षी पुराचा वेढा

  • नाम फाऊंडेशनचा पुढाकार आणि लोकसहभागाने गतवर्षी गाळ उपसा

  • जिल्हा नियोजनचीही गाळ उपशाला साथ

  • अर्जुना नदीपात्रातील गतवर्षी १.६५ लक्ष घनमीटर गाळाचा उपसा

  • यावर्षी अर्जुना नदीपात्रातील सुमारे एक ते सव्वा लाख घनमीटर गाळाचा उपसा

  • अर्जुना नदीपात्राची गाळ उपशापूर्वीची रुंदी सुमारे पंचवीस ते तीस मीटर

  • अर्जुना नदीपात्राची गाळ उपशानंतरची रुंदी सुमारे पन्नास ते साठ मीटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT