कोकण

छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर पुन्हा रणजीचे सामने

CD

rat०८२३.TXT

बातमी क्र. २३ (पान २ साठीमेन)

फोटो ओळी
- rat८p२१.jpg-
८१३३३
रत्नागिरी ः येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरील क्रिकेट मैदानाच्या नुतनीकरण कामाची सुरवात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रदीप उर्फ बाळू साळवी, सुरेश जैन, सईद मुकादम, दिपक मोरे, दिपक पवार, बलराम कोतवडेकर, पराग पाटणे, सुनिल घोसाळकर आणि अन्य पदाधिकारी.
(राजेश कळंबटे ; सकाळ छायाचित्रसेवा)
- rat८p२२.jpg-
८१३३४
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण
--
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाला रणजीचे वेध

मैदानाचे होणार नुतनीकरण ; तज्ज्ञांची मदत ; नऊ खेळपट्टया तयार करणार
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ८ः येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर रणजी किंवा प्रथम श्रेणी दर्जाचे सामने खेळले जावेत यादृष्टीने फक्त क्रिकेटसाठी पुरक असे मैदान बनविण्यात येणार आहे. सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाला आजपासून (ता. ८) सुरवात झाली. ७० मिटरच्या मैदानाला फेंन्सिंग केले जाणार असून नऊ खेळपट्ट्या बनविण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या तज्ज्ञ क्युरेटर्सची मदत घेतली जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळवून देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर क्रिकेटचे मैदान आहे. या ठिकाणी अनेक दर्जेदार खेळाडूंचे करिअर घडले आहे. नगरपालिकेकडे असलेल्या या मैदानाची देखभाल दुरुस्तीही तेवढ्याच गांभिर्याने केली जाते; परंतु पुरेसा निधी नसल्याने ते फक्त क्रिकेट सामन्यांसाठी विकसित करता आले नव्हते. या मैदानावर अन्य खेळ, विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे खेळपट्टीची दुरवस्था झाली. पूर्वी याच मैदानावर चार रणजी सामने झाले होते. आता नव्याने क्रिकेटसाठी मैदान बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री सामंत यांनी शासनाच्या योजनेतून क्रिकेट मैदानासाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. रणजी किंवा प्रथम श्रेणीचे सामने भरविण्यासाठी आवश्यक मैदान यामधून बनवले जाणार आहे. मैदानामध्ये इरिगेशन यंत्रणा, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जमिनीतून ड्रेनेज सिस्टीम, मुख्य खेळपट्टीसह नऊ खेळपट्ट्या बनविल्या जातील. मुख्य खेळपट्टी बनविताना साधारणपणे दोन फुटाची खोदाई केली जाणार आहे. काळा दगडाचा एक थर, विटांचा थर, मातीचा थर आणि त्यावर गवताचा थर टाकून क्रिकेटला पोषक अशी खेळपट्टी बनविली जाईल. यासाठी २२ इंचापर्यंत खोदाई केली जाणार असुन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या तज्ज्ञ क्युरेटस्ची मदत घेण्यात येणार आहे. मैदानाचे आऊटफिल्ड बनविताना जुने गवत काढून खोदाई केली जाईल. तिथे थर टाकून त्यावर फुटभर उंचीचे सिलेक्शन वन प्रकारची गवत यावर टाकण्यात येणार आहे. हे मैदान ७० यार्डाचे असुन बाहेरील बाजुने फेन्सिंग केले जाणार आहे. मैदानाची जुनी माती खणून काढावी लागणार आहे.
--
कोट
दर्जेदार क्रिकेटपटू रत्नागिरी जिल्ह्यात घडवण्यासाठी हे मैदान बनविण्याचे काम हाती घेतले आहे. ते वर्षभर सुरू राहणार असून भविष्यात रणजीसारखे सामने खेळवणे शक्य होईल.
- प्रदीप उर्फ बाळू साळवी, कार्याध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT