कोकण

नवा शास्त्रीपूल पूर्ण, जोडरस्त्याचा पत्ताच नाही

CD

rat६p३.jpg
०७४२४
संगमेश्वरः पावसाळ्यापूर्वी नवीन शास्त्रीपुलावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी.
------------
नवा शास्त्रीपूल वाहतुकीस सुरू करा
जुना पूल धोकादायक; वाहनचालक, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
संगमेश्वर, ता. ६ः ब्रिटिशकालीन शास्त्रीपूल हा अतिशय धोकादायक बनला असताना चौपदरीकरणाच्या कामात पुलाचे काम संथगतीने होत आहे. कुर्म गतीने काम करण्याची सवय झाल्यामुळे दोन्ही बाजूंचे जोड रस्त्याचे काम अपूर्ण ठेवले आहे. मान्सून तोंडावर येऊन ठेपला असतानाही नवीन पूल वाहतुकीस सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी नवीन पूल वाहतुकीस सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शास्त्रीपूल येथे वाहतूककोंडी ठरलेली असून या काळात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अशावेळी एखादी रुग्णवाहिका तातडीने उपचारासाठी रुग्णाला घेऊन जात असेल तर मात्र पर्याय उपलब्ध होत नाही. दोन मोठी वाहने एकाचवेळी या पुलावरून जाऊ शकत नाही. रात्रीच्यावेळी अनेकदा येथे दोन मोठी वाहने समोरासमोर येऊन वाहतूक कोंडीही होते. जवळपास अर्धा ते एक तास वाहतूक ठप्प होण्याचे प्रसंग अनेकदा घडलेले आहेत. नवीन पुलाची उभारणी रडतखडत पूर्ण झाली. नवीन पूल उभारणाऱ्या कंपनीने गर्डरची उभारणी करताना नदीत टाकलेली माती आणि सिमेंटच्या बैठका बाजूला न केल्याने येथे पाणी अडण्याची भिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी ठेकेदार कंपनीने नदीत टाकलेली माती आणि सिमेंट बाजूला करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नवीन शास्त्रीपुलाची उभारणी पूर्ण झालेली असताना केवळ जोडरस्ते पूर्ण नाहीत म्हणून यावर्षीच्या पावसाळ्यात जुन्या आणि धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू ठेवली आणि काही गंभीर प्रसंग ओढवला तर याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागावर राहील, असेही ग्रामस्थांनी नमूद केले आहे. या बाबींमुळे संगमेश्वर परिसरातील वाहनचालक आणि ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग व प्रशासनाला या बाबतीत योग्य त्या तातडीच्या उपाययोजना करून नवीन पूल तत्काळ किमान एक मार्गतरी सुरू करावा. त्यामुळे वाहतूक कोंडी न होता प्रवास थोडा का होईना सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने जर या मागणीकडे लक्ष दिले नाही तर शास्त्रीपूल येथे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच श्रीराम शिंदे यांनी दिला आहे.
------
चौकट
शास्त्रीपुलाची उभारणी १९३३ ला
या शास्त्रीपुलाची उभारणी गॅमन इंडिया या कंपनीने १९३३ ला केली. पूल उभारणीला आता ९० वर्षे होऊन गेली आहेत. हा ब्रिटीशकालीन पूल आहे. सद्यःस्थितीत अवजड वाहन जाताना हा पूल हलत असल्याने धोकादायक बनला आहे. पुलाच्या उभारणीनंतर फार मोठी डागडुजीदेखील झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT