कोकण

राजापूर-ग्रामपंचायतींना बांबू, तुती लागवडीचे उद्दिष्ट

CD

rat14p27.jpg
83667
बांबूचे रोप
rat14p28.jpg
83668
तुतीची रोपे
--------------
ग्रामपंचायतींना बांबू, तुती लागवडीचे उद्दिष्ट
राजापूरला प्रत्येकी पाचशे हेक्टर; बेरोजगारांच्या हाताला काम
राजापूर, ता. १४ः बेरोजगारांच्या हाताला काम देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गंत (मनरेगा) तालुक्यामध्ये यावर्षी फळबाग लागवडीसोबत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जादा उत्पन्न मिळवून देणारी बांबू लागवड आणि नाविन्यपूर्ण तुती लागवडीच्या माध्यमातून रेशीम शेती केली जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला फलबाग लागवड, बांबू लागवड आणि तुती लागवडीचे प्रत्येकी किमान पाच हेक्टर याप्रमाणे तालुक्याला प्रत्येकी पाचशे हेक्टरपेक्षा जास्त लागवडीचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती पंचायत समिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
बेरोजगारांच्या हाताला काम देताना त्याला किमान रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत गेल्या काही वर्षामध्ये पंचायत समिती, कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावांमध्ये विविध प्रकारची फळबाग लागवड केली जात आहे. त्याप्रमाणे यावर्षीही मनरेगांतर्गंत तालुक्यामध्ये फळबाग लागवड करण्यात येणार आहे. या फळबाग लागवडीसोबतच यावर्षी बांबू लागवड आणि तुती लागवडी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. जाधव, तालुका कृषी अधिकारी परेश सुर्वे, कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे आणि सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये करताना या लागवडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येताना बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला फळबाग लागवड, बांबू लागवड आणि तुती लागवडीचे प्रत्येकी किमान पाच हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याची तालुक्यामध्ये शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाने दिली. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेवून फळबाग लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी परेश सुर्वे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT