कोकण

-कोकणातून जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी

CD

वारकऱ्यांना टोल माफी

परिवहन विभागाचा आदेश ; आरटीओत पासची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : आषाढी वारीनिमित्त कोकणातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी तसेच भाविकांना टोल माफी करण्यात आली आहे. ही सवलत मिळण्यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पासेस जारी करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत १४ जूनला बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आषाढीवानित्त कोकणातून पंढरपूर जाणाऱ्या पाणख्या, भाविक व वारकऱ्यांना २४ ते २९ जुलै या कालावधीसाठी रत्नागिरीतून पंढरपूरला जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहनांना टोलमधून सूट मिळावी म्हणून परिवहन विभागाने टोल पास जारी केले आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आवाहन करण्यात येते की, कोकणातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी व वारकरी त्यांच्या वाहनाचे मुदतीतील सर्व कागदपत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावे. त्यांना ४ ते २१ जुलै या कालावधीसाठी या कार्यालयातून टोल पास जारी करण्यात आले आहेत. तरी सर्व भाविकांनी व वारकऱ्यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन रत्नागिरी आरटीओने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT