Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup सुरु असतानाच टीम इंडियाचे 'हे' दोन खेळाडू मायदेशी परतणार

Pranali Kodre

Team India: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाची आत्तापर्यंतची कामगिरी चांगली झाली आहे. भारताने पहिल्या फेरीतील पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे सुपर-8 मधील स्थानही पक्के केले आहे.

अशात आता अशी माहिती मिळत आहे की सध्या भारतीय संघाबरोबर असलेले शुभमन गिल आणि आवेश खान हे दोन खेळाडू मायदेशी परतण्याची शक्यता आहे.

भारताने पहिले तिन्ही सामने न्युयॉर्कला झाले. त्यानंतर आता पहिल्या फेरीतील अखेरचा सामना कॅनडा विरुद्ध फ्लोरिडाला होणार आहे. भारतीय संघ फ्लोरिडाला पोहचला आहे.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार फ्लोरिडाला शनिवारी (15 जून) सामना झाल्यानंतर शुभमन गिल भारतात परतणार आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज आवेश खान हा देखील मायदेशी परत येऊ शकतो.

शुभमन गिल आणि आवेश या दोघांचाही या टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे. दरम्यान, अशी माहिती मिळत आहे की पहिल्या फेरीत दुखापतींसाठी खबरदारी म्हणून हे दोघेही भारतीय संघाबरोबर होते. कारण जर संघातील एखाद्या खेळाडूला दुखापत झाली असती, तर त्यांना त्वरित अमेरिकेत पाठवणे कठीण झाले असते.

त्यामुळे या दोघांनाही 14 जून किंवा 15 जून पर्यंत संघासह थांबण्यास सांगण्यात आले होते.

तथापि, सध्या कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली सलामीला फलंदाजी करत आहे. त्यामुळे यशस्वी जैस्वाल सलामीसाठी एक पर्याय आहे. त्याचबरोबर भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये खेळताना फिरकी गोलंदाजांना अधिक संधी देण्याची शक्यता आहे. त्याचमुळे गिल आणि आवेश परत येऊ शकतात.

बीसीसीआयने राखीव खेळाडूंमध्ये गिल आणि आवेश यांच्यासह खलील अहमद आणि रिंकु सिंग यांचाही समावेश आहे.

मात्र, सुपर-8 मधील काही सामने होईपर्यंत खलील आणि रिंकु भारतीय संघासह कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला सुपर-8 मधील सामना बार्बाडोस आणि अँटिग्वा येथे खेळायचे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT