Team India 
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India: मुंबईच्या 4 खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आज सत्कार; 1 कोटींचे बक्षीस देऊन होणार गौरव

कार्तिक पुजारी

मुंबई- टीम इंडियाच्या मुंबईतील चार खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, त्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्य कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार सरकार करणार आहे. महाराष्ट्र सरकारडून या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये गौरव करण्यात येईल.

शुक्रवारी टीम इंडियाची विजयी मिरवणूक मुंबईत काढण्यात आली होती. आपल्या विजयी टीमला पाहण्यासाठी मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर चाहत्यांनी लाखोच्या संख्येने हजेरी लावली होती. नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी टीम इंडियाची मिरवणूक काढण्यात आली होती. वानखेडे स्टेडियमवर ग्रँड सेलिब्रेशन झाले. यावेळी बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचा चेक बक्षीस म्हणून देण्यात आला आहे.

टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपमध्ये साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आणि ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या चार दिवसांपासून भारतीय चाहते आपल्या आवडत्या टीमची वाट पाहत होते. मात्र, बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया काही दिवस तिथे अडकली होती. अखेर गुरुवारी सकाळी टीम इंडियाचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले आणि चाहत्यांच्या जल्लोषाला सुरुवात झाली.

विधिमंडळात मुंबईतील खेळाडूंचा सत्कार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतल्या चार खेडाळूंचा आज चार वाजता सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

NIA Raid : ‘एनआयए’चे देशभर २२ ठिकाणी छापे; संशयास्पद साहित्य जप्त, राज्यामध्येही कारवाई

Narendra Modi : ‘काँग्रेस’चा विचारच परदेशी; वाशीमच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

Rahul Gandhi : आरक्षण मर्यादा वाढवणारच! कोल्हापुरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निर्धार

Calcutta Crime : पश्चिम बंगाल पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

SCROLL FOR NEXT