India vs Pakistan X/ICC
क्रिकेट

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Pranali Kodre

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने तयारीलाही सुरुवात केली आहे. पण तरी या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही, यावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. यावर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतिफने प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने म्हटले आहे की या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानला यायचे नसेल, तर त्याचे योग्य कारण द्यायला हवे. त्याच्या म्हणण्यांनुसार आयसीसी स्पर्धेला नाकारल्याने संघाला त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात.

सध्या अशी चर्चा आहे की भारतीय संघ पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणार नाही किंवा हायब्रिज मॉडेलचा वापर या स्पर्धेतही करण्यात येऊ शकतो.

अशात आयएएनएसशी बोलताना लतिफ म्हणाला, 'तुम्ही द्विपक्षिय मालिकेला नकार देऊ शकतो. पण आयसीसी स्पर्धेला नकार देणे कठीण आहे. जेव्हा आयसीसी काही योजना तयार करते, तेव्हा संघांना कुठे खेळायचे आहे, हे माहित असते.

'जसे पाकिस्तानला माहित होते की त्यांना वनडे वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात जायचे आहे. त्यानुसारच क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या करारावर स्वाक्षरी करत असतात.'

याशिवाय लतिफ असेही म्हणाले की 'आयसीसी स्पर्धा नाकारणे कठीण असते. १९९६ वर्ल्ड कपवेळी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेला जाण्यासाठी नकार दिलेला, तेव्हा संपूर्ण ग्रुपमध्ये बदल झाला आणि श्रीलंका चॅम्पियन झाले. अशी मोठी चूक होते.'

'जर भारत किंवा पाकिस्तानने त्यासाठी स्वाक्षरी केली आहे, तर त्यांना त्या स्पर्धेला जावे लागणार आहे. जर राजकीय स्थरावर काही परिस्थिती उद्भवली, तर तुम्हाला न येण्यासाठी योग्य कारण द्यावे लागेल. पाकिस्तान योग्य नाही वैगरे गोष्टी सांगून तुम्ही द्विपक्षीय मालिकेला नाही म्हणू शकता, पण माझ्यामते आयसीसी स्पर्धेला नाकारणे महागात पडू शकते.'

दरम्यान, आता भारतीय सरकार आणि बीसीसीआय याबाबत काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे. त्याचबरोबर काही रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाचा ड्राफ्ट तयार केला असून तो आयसीसीकडे पाठवला आहे.

या ड्राफ्टनुसार सामने कराची, रावळपिंडी आणि लाहोरला होऊ शकतात. भारताचे सर्व सामने आणि अंतिम सामना लाहोरला होईल. पण आता अद्यापही आयसीसी किंवा बीसीसीआयची याबाबतची भूमिका स्पष्ट झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT