Team India  Sakal
क्रिकेट

IND vs BAN: भारतीय संघाच्या वादळात बांगलादेश नेस्तनाबूत! कसोटीपाठोपाठ T20I सिरिजमध्येही व्हाईटवॉश

Pranali Kodre

India vs Bangladesh 3rd T20I: भारतीय संघाने शनिवारी (१२ ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध हैदराबादला झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात १३३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची टी२० मालिका ३-० अशा फरकाने जिंकत बांगलादेशला व्हाईटवॉश दिला.

यापूर्वी भारताने कसोटी मालिकेतही बांगलादेशला २-० असा व्हाईटवॉश दिला होता. त्यामुळे आता बांगलादेश भारत दौऱ्यातून रिकाम्या हाताने मायदेशी परतणार आहेत.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने बांगलादेश समोर २९८ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकात ७ बाद १६७ धावाच करता आल्या. या सामन्यानंतर बांगलादेशचा अष्टपैलू महमुद्दुलाहने निवृत्ती घेतली.

बांगलादेशकडून परवेझ हुसैन इमॉन आणि तान्झिद हसन यांनी डावाची सुरुवात केली होती. पण पहिल्याच चेंडूवर परवेझला मयंक यादवने रियान परागच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर तान्झिदने कर्णधार नजमुल हुसैन शांतोच्या सहाय्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु., तान्झिद हसन १५ धावा करून, तर शांतो १४ धावांवर बाद झाला.

यानंतर लिटन दास आणि तौहिद हृदोयने अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. त्यांनी १०० धावांचा टप्पा संघाला १० षटकांच्या दरम्यान पार करून गिला. पण लिटन दासला १२ व्या षटकात रवी बिश्नोईने ४२ धावांवर बाद केले.

यानंतर मात्र एक बाजू अर्धशतकी खेळी करत तौहिदने सांभाळलेली असताना दुसऱ्या बाजूने महमुद्दुलाह (८), मेहदी हसन (३) आणि रिशाद हुसैन (०) यांनी स्वस्तात विकेट्स गमावली. अखेरीस तौहिद ४२ चेंडूत ६३ धावांची खेळी करून नाबाद राहिला. तान्झिम हसन साकिब ८ धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मयंक यादवने २ विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद २९७ धावांचा डोंगर उभारला होता. सलामीवीर अभिषेक शर्मा ४ धावांवर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने १११ धावांची वादळी शतकी खेळी केली. तसेच सूर्यकुमारने ७५ धावांची खेळी केली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी झाली.

त्यांच्यानंतर रियान पराग (३४ धावा) आणि हार्दिक पांड्या (४७ धावा) यांनीही आक्रमक खेळ केला. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या उभारली.

बांगलादेशकडून तान्झिम हसन साकिबने ३ विकेट्स घेतल्या, तर तस्किन अहमद, मुस्तफिजूर आणि महमुद्दुलाह यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पकडलेल्या दोघांपैकी एक यूपी तर दुसरा हरियानाचा

CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

Baba Siddiqui Case: ...हे मोठं षडयंत्र; बाबा सिद्दिकींची हत्या चिंतेची बाब, भाजप नेत्याची प्रतिक्रिया

Samir Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

SCROLL FOR NEXT