Hardik Pandya Or KL Rahul To Lead India In ODI Series Against Sri Lanka sakal
क्रिकेट

SL vs IND : रोहित नाही तर... श्रीलंका दौऱ्यावर 'हा' पठ्ठ्या असणार टीम इंडियाचा कर्णधार? लवकर होणार घोषणा

Kiran Mahanavar

India Tour Sri Lanka 2024 : टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. जिथे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. भारतीय संघ या दौऱ्यातील शेवटचा सामना 15 जुलै रोजी खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

टीम इंडिया या दौऱ्यावर नवीन कोच आणि नवा कर्णधार घेऊन जाऊ शकते. पण श्रीलंकेसोबतच्या वनडे आणि टी-20 मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल, हा मोठा प्रश्न आहे.

रोहित शर्मा ब्रेकवर

टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्मा आता ब्रेकवर गेला आहे. अशा स्थितीत श्रीलंका दौऱ्यावर त्याची वनडे मालिका खेळण्याची शक्यताही कमी असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्यासाठी रोहितशिवाय विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाऊ शकते.

भारताला जुलैच्या अखेरीस श्रीलंकेसोबत एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. रोहित आणि विराट याआधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. दरम्यान आता एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी दोन खेळाडूंच्या नावाची चर्चा होत आहे.

केएल राहुल किंवा हार्दिक पांड्या

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो. याशिवाय एकदिवसीय मालिकेसाठी हार्दिकला कर्णधार बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो, परंतु त्यात केएल राहुल देखील आहे.

बीसीसीआय केएल राहुलकडेही दुर्लक्ष करू शकत नाही. केएल राहुल आयपीएल 2024 पासून क्रिकेट क्षेत्रापासून दूर आहे, त्याला 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संघातही संधी मिळाली नाही. मात्र आता राहुल श्रीलंका दौऱ्यातून संघात पुनरागमन करू शकतो. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत केएल राहुलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. अशा परिस्थितीत राहुल पुन्हा एकदा कर्णधारपद भूषवताना दिसू शकतो.

पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, रोहित आणि विराट स्वतः वनडे संघात पुनरागमन करण्याचे संकेत देतील. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला इंग्लंडसोबत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे, जी त्यांच्यासाठी पुरेशी आहे. पुढील काही महिन्यांत हे दोन्ही खेळाडू कसोटी सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करतील, कारण टीम इंडियाला सप्टेंबर ते जानेवारी 2025 या कालावधीत 10 कसोटी सामने खेळायचे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT