Team India Sakal
क्रिकेट

IND vs BAN 1st Test: भारताने चौथ्याच दिवशी बांगलादेशला केलं पराभूत! शतक अन् ५ विकेट्स घेणारा अश्विन विजयाचा शिल्पकार

Pranali Kodre

India won Chennai Test against Bangladesh: भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध चेन्नईला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २८० धावांनी विजय संपादन केला आहे. चेपॉक स्टेडियमवर मिळवलेल्या या विजयामुळे भारताने मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली.

भारताच्या या विजयात अनेक खेळाडूंचे योगदान राहिले. तरी आर अश्विन विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने फलंदाजी करताना शतकही केले, तर गोलंदाजी करताना दुसऱ्या डावात ५ विकेट्सही घेतल्या.

या सामन्यात भारताने बांग्लादेश समोर विजयासाठी ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला दुसऱ्या डावात ६२.१ षटकात २३४ धावाच करता आल्या. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसैन शांतोने अर्धशतक करत चांगली झुंज दिली होती. पण त्याला फारशी कोणाची साथ मिळाली नाही.

बांगलादेशने चौथ्या दिवशी ३७.२ षटकापासून आणि ४ बाद १५८ धावांपासून पुढे खेळायला सुरूवात केली होती. यावेळी शांतो ५१ धावांवर आणि शाकिब अल हसन ५ धावांवर नाबाद होते. त्यांनी चौथ्या दिवशीही सुरुवात चांगली केली होती. बांगलादेशला १९० धावांचा टप्पाही पार करून दिला होता.

परंतु ५२ व्या षटकात शाकिबला आर अश्विनने यशस्वी जैस्वालच्या हातून २५ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर लगेचच रविंद्र जडेजाने लिटन दासला १ धावेवर माघारी पाठवले. मेहदी हसन मिराजलाही अश्विनने फार काळ टिकू न देता ८ धावांवर बाद केले.

तरी एक बाजू शांतो सांभाळत होता. पण त्याचा अडथळा ५९ व्या षटकात रविंद्र जडेजाने दूर केला. शांतोने १२७ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावा केल्या.

अखेरीस अश्विनने तस्किन अहमदला, तर हसन मेहमुदला रविंद्र जडेजाने बाद करत बांगलादेशचा डाव सांभाळला. या डावात बांगलादेशकडुन सलामीवीर झाकिर हसनने ३३ आणि शादमन इस्लामने ३५ धावांची खेळी केली होती.

भारताकडून या डावात अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजाने ३ विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताने पहिल्या डावात ९१.२ षटकात सर्वबाद ३७६ धावा केल्या. भारताकडून आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी १९९ धावांची भागीदारी केली.

यादरम्यान अश्विनने शतकी खेळी केली. अश्विनने ११३ धावांची खेळी केली. तसेच जडेजाने ८६ धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालनेही ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या डावात बांगलादेशकडून हसन मेहमुदने ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

यानंतर बांगलादेशला प्रत्युत्तरात पहिल्या डावात ४७.१ षटकात १४९ धावाच करता आल्या. बांगलादेशकडून केवळ शाकिब अल हसनने ३० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने ३२ धावा केल्या.

या डावात भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. भारताला पहिल्या डावात २२७ धावांची आघाडी मिळाली होती.

दुसरा डाव भारताने ६४ षटकात ४ बाद २८७ धावांवर घोषित केला. भारताकडून शुभमन गिलने नाबाद ११९ धावांची खेळी केली, तर ऋषभ पंतने १०९ धावा केल्या. या दोघांमध्ये १६७ धावांची भागीदारीही झाली. या डावात बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने २ विकेट्स घेतल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आपण PM मोदींसोबत आहोत हेच विसरले बायडेन; फजितीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Duleep Trophy: अर्शदीपच्या ६ विकेट्स अन् श्रेयस अय्यरच्या संघाने चाखली विजयाची चव, पण फायदा होणार ऋतुराजच्या संघाला?

Pitru Paksha 2024 :  नदी, घर, झाडं आणखी बरंच काही…! कुठे कुठे करू शकतो पितृपक्षात पिंडदान?

Latest Maharashtra News Live Updates: आमचे एक तत्व आहे की, जर आपल्याला शांततेने जगायचे असेल, तर आपले शेजाऱ्यांशी चांगले संबंध असले पाहिजेत- राजनाथ सिंह म्हणतात

Electricity Saving Tips : वाढत्या वीज बिलांमुळे हैराण आहात? या भन्नाट ट्रिकने खर्च होईल निम्मा

SCROLL FOR NEXT