sanju samson  esakal
क्रिकेट

IND vs BAN: मी पाहिलेल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक; कर्णधाराकडून संजूचे कौतुक, BCCIने केला व्हिडीओ शेअर

सकाळ डिजिटल टीम

Cricket Viral Video: बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी सामन्यात संजू सॅमसनने धमाकेदार शतक झळकावले. संजूने केवळ ४१ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. या १११ धावांच्या खेळीदरम्यान संजूने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले. त्याने रिशाद हुसैनविरुद्ध १० व्या षटकात सलग ५ षटकार मारण्याचाही पराक्रम केला. संजू सॅमसन या स्फोटक खेळीमुळे सामनावीर ठरला. सामनावीर संजू आणि कर्णाधार सुर्यकुमार यादवचा सामन्यानंतरचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे.

या व्हिडीयोतील संवादामध्ये सुर्यकुमार यादव म्हणाला, " मला माहित आहे की या खेळीची तू मागच्या काही काळापासून वाट पाहत होतास. कृपया या खेळीबद्दल प्रेक्षकांना सांग." त्यावर उत्तर देत संजू म्हणाला, मी या खेळीनंतर खुप खुश आहे. या खेळीनंतर मी भावनिक झालो. परंतु मी भाग्यवान आहे की आजच्या दिवशी माझ्याकडून ही खेळी खेळली गेली, प्रत्येकाची आप-आपली एक वेळ असते. मी फक्त माझे काम करत राहिलो आणि स्वत:वर विश्वास ठेवला. तु माझ्यासोबत शतक सेलिब्रेट केल्यामुळे मला आणखी आनंद झाला."

त्यावर सुर्या म्हणाला, "मी नॉन-स्ट्राईकवरून या खेळीचा आनंद घेत होतो. मला एक गोष्ट सांग ज्यावेळी तू ९६ धावांवर खेळत होतास आणि शतकासाठी अवघ्या ४ धावांची गरज असताना धोका पत्करून तू समोरच्या दिशेने चौकार मारलास, त्यावेळी तुझ्या डोक्यात काय चालू होते ?" यावर संजूने उत्तर दिले की, माझ्या डोक्यात एकच विचार होता, मागच्या काही सामन्यांमध्ये आपण जे आक्रमक वातावरण निर्माण केले होते ते मला कायम ठेवायचे होते. प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलेल्या 'आक्रमक खेळा आणि नम्र रहा' या दोन गोष्टींचे मी पालन केले."

"तु संघासाठी निस्वार्थी खेळी खेळलास. 'टीम फर्स्ट, सेल्फ गोल लास्ट' अशा पद्धतीने खेळ केलास, त्यामुळे तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. मी तुझ्या आजच्या खेळीसाठी खरच खुप खुश आहे." सुर्या म्हणाला. कालच्या सामन्यातील या दोन हीरोंचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव व संजू सॅमसनने कालच्या सामन्यात विक्रमी भागीदारी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० चेंडूंमध्ये १७३ धावांची मोठी भागिदारी केली. ज्यामुळे टीम इंडियाने सामन्यात २९७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ७५ धावांची धमाकेदार खेळी केली. संजूने ११ चौकार व ८ षटकारांसह १११ धावा करत शतक झलकावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

Women's T20 World Cup: निराश नका होऊ! टीम इंडिया अजूनही Semi Final ला जाणार; दुसऱ्या पराभवानंतर वाचा कसं आहे गणित

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

SCROLL FOR NEXT