Sri Lanka Women Cricket Team Sakal
क्रिकेट

Women's Asia Cup 2024: श्रीलंकेने जिंकली ट्रॉफी! फायनलमध्ये गतविजेत्या टीम इंडियाला पाजले पराभवाचे पाणी

Pranali Kodre

Women's Asia Cup 2024, India vs Sri Lanka Final: महिला आशिया कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद श्रीलंका महिला संघाने जिंकले आहे. रविवारी (२८ जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारतीय महिला संघाचा ८ विकेट्सने पराभव केला आणि विजेतेपदाला गवसणी घातली.

श्रीलंका महिला संघाने पहिल्यांदाच आशिया कप विजेतेपदावर नाव कोरले आहे. तसेच महिला आशिया कप स्पर्धा जिंकणारा श्रीलंका भारत आणि बांगलादेशनंतरचा तिसराच संघ ठरला आहे.

यापूर्वी भारतीय महिला संघाने ७ वेळा आशिया कप जिंकला आहे, तर बांगलादेशने एकदा आशिया कप उंतावरण्याचा कारनामा केला आहे.

दरम्यान डंबुला येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला १६६ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग श्रीलंकेने १८.४ षटकात २ विकेट्स गमावत १६७ धावा करत सहज पूर्ण केला. श्रीलंकेकडून कर्णधार चमारी अट्टापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा यांनी अर्धशतके केली.

भारताने श्रीलंकेला १६६ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग श्रीलंकेने १८.४ षटकात २ विकेट्स गमावत १६७ धावा करत सहज पूर्ण केला. श्रीलंकेकडून कर्णधार चमारी अट्टापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा यांनी अर्धशतके केली.

भारताने दिलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने पहिली विकेट दुसऱ्याच षटकात गमावली होती. विष्मी गुणारत्नेला उमा छेत्री आणि ऋचा घोष यांनी मिळून १ धावेवर धावबाद केलं होतं. मात्र त्यानंतर चमारी अट्टापट्टूने हर्षिताला साथीला घेतला आणि श्रीलंकेचा डाव पुढे नेला.

या दोघींनी मिळून १२ षटकांमध्ये ९० धावांचा टप्पा श्रीलंकेला पार करून दिला. पण अखेर अट्टापट्टूला १२ व्या षटकात दिप्ती शर्माने त्रिफळाचीत केले आणि ८७ धावांची भागादारी तोडली.

मात्र असं असलं तरी हर्षिताला अखेरी कविशा दिलहारीने चांगली साथ दिली. त्या दोघींनी मिळून श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचवलं. श्रीलंकेकडून अट्टापट्टूने ४३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावा केल्या.

तसेच हर्षिताने ५१ चेंडूत ६९ धावांची नाबाद खेळी करताना ६ चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय कविशाने १६ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावांची नाबाद खेळी केली.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या होत्या. भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तसेच ऋचा घोषने ३० धावा, तर जेमिमाह रोड्रिग्सने २९ धावांची खेळी केली.

श्रीलंकेकडून कविशाने २ विकेट्स घेतल्या, तर उदेशिका प्रबोधनी, सचिनी निसांसाला आणि कर्णधार चमारी अट्टापट्टू यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharatvakya Book Publication : ‘भरतवाक्य’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कोअर कमिटीची 4 तास बैठक; भाजप उमेदवार कधी निश्चित करणार? मिटींगनंतर तारीख सांगितली, जाणून घ्या...

अतुल यांच्या निधनानंतर व्हायरल होतोय त्यांचा जगणं शिकवणारा व्हिडिओ; म्हणालेले- समोरच्यासाठी आपण काय आहोत...

IAS Promotion: राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी बनले 'आयएएस'; पुण्यातील 4 जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT